शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मी तुमच्याएवढा होतो, तेव्हा कोणी अपेक्षाच ठेवत नव्हता...; नारायण मूर्तींचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 22:38 IST

तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा....

देशाला सर्वात महत्वाची अशी आयटी कंपनी देणाऱ्या इन्फोसिसच्या सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी आज देशाबरोबरच आपल्या आयुष्याचा प्रवास कसा झाला हे सांगितले. अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ते विद्यार्थी आणि तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी २००८ चा एक किस्सा सांगितला. 

तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. एखादी बैठक सुरु झाली किंवा विषय निघाला की तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा. मी जेव्हा बोर्डावरून बाहेर पडलो तेव्हा क्वचितच भारताचे नाव घेतले जात होते. तर चीनचे नाव २५ ते तीस वेळा घेतले जात होते. या चीनने केवळ ४४ वर्षांत भारताला मागे टाकले. त्या काळात भारतासोबत काय झाले हे आपल्याला माहिती नाही. मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्तीमत्व होते, माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. परंतू युपीएच्या काळात देशाचा विकास खुंटला गेला, असे ते म्हणाले. 

तो असा काळ होता, की या काळात वेगाने निर्णय घेतले जात नव्हते. प्रत्येक कामात विलंब होऊ लागला होता. याच काळात भारत चीनपेक्षा मागे पडू लागला. यामुळे मला वाटतेय की तुमची पीढी खूप महत्वाचे काम करू शकेल. जिथे जिथे चीनचे नाव येईल तिथे भारताचेही नाव आले पाहिजे, असे काम तुम्ही करायला हवे. जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो, तेव्हा माझ्यावर कोणताही जबाबदारी नव्हती. नाही कोणी माझ्याकडून काही अपेक्षा करत होता. भारताचीही तिच परिस्थिती होती. देशाकडूनही जग फारशी अपेक्षा करत नव्हते. पण आज तुम्ही देशाला पुढे न्याल अशी अपेक्षा आहे. मला वाटते की तुम्ही लोक भारताला चीनचा योग्य प्रतिस्पर्धी बनवू शकाल, असे मूर्ती म्हणाले. 

जेव्हा मनमोहन सिंग अर्थ मंत्री होते, आणि १९९१ मध्ये देशाच्या आर्थिक क्रांतीला सुरुवात झाली. आता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडियासारख्या योजना सुरु केल्यात, त्यामुळे भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असे मूर्ती म्हणाले. एक काळ होता जेव्हा पाश्चात्य देशांचे लोक भारताकडे नुसते पाहत असत, पण आज त्यांच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असे मूर्ती म्हणाले.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarayana Murthyनारायण मूर्तीNarendra Modiनरेंद्र मोदी