शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:07 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी(दि.२१) काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. 'मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,' अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, 'या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते १९६० पर्यंत भारत जगातील सहावी अर्थव्यवस्था होती. त्यापूर्वी १७ व्या आणि १८ व्या शतकात हा देश जगातील नंबर वन अर्थव्यवस्था होता. आधी आपल्याला प्रथम मुघलांनी लुटले, नंतर ब्रिटिशांनी लुटले. त्यानंतर जे उरले, ते काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने लुटले.'

यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि सपावर 'संकुचित मानसिकता' असल्याचा आणि अराजकतेचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. 'काँग्रेस असो किंवा समाजवादी पक्ष, दोघांचीही मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या दृष्टिकोनाशी जुळत नाही. या संकुचित दृष्टिकोनामुळे हे लोक फक्त त्यांच्या कुटुंबांचा विकास करत राहिले. परिणामी उत्तर प्रदेश आणि देश मागे पडला, गरिबी वाढली, गुंडगिरी वाढली. काँग्रेस आणि सपाच्या राजवटीत ना व्यापारी सुरक्षित होता, ना पोलिस स्टेशन, ना माता भगिनी...' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी