शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:07 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी(दि.२१) काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. 'मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,' अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, 'या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते १९६० पर्यंत भारत जगातील सहावी अर्थव्यवस्था होती. त्यापूर्वी १७ व्या आणि १८ व्या शतकात हा देश जगातील नंबर वन अर्थव्यवस्था होता. आधी आपल्याला प्रथम मुघलांनी लुटले, नंतर ब्रिटिशांनी लुटले. त्यानंतर जे उरले, ते काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने लुटले.'

यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि सपावर 'संकुचित मानसिकता' असल्याचा आणि अराजकतेचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. 'काँग्रेस असो किंवा समाजवादी पक्ष, दोघांचीही मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या दृष्टिकोनाशी जुळत नाही. या संकुचित दृष्टिकोनामुळे हे लोक फक्त त्यांच्या कुटुंबांचा विकास करत राहिले. परिणामी उत्तर प्रदेश आणि देश मागे पडला, गरिबी वाढली, गुंडगिरी वाढली. काँग्रेस आणि सपाच्या राजवटीत ना व्यापारी सुरक्षित होता, ना पोलिस स्टेशन, ना माता भगिनी...' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी