शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:31 IST

IC 814 Kandahar hijack: नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.

नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी ते अपहरणकांड आणि जसवंत सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मानवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आयसी ८१४ या अपहरण झालेल्या प्रवासी विमानाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारताच्या एका विमानानं हवेत उड्डाण केलं होतं. त्यामध्ये एनएसजी कमांडो तैनात होते. जर दुबईने परवानगी दिली असती तर भारताने तिथेच कारवाई केली असती. मात्र दुबईकडून तशी परवानगी मिळाली नाही. मात्र भारताने अपहरणकर्त्यांवर आणलेला दबाव काही प्रमाणात उपयोगाला आला. तसेच विमानात इंधन भरण्याच्या मोबदल्यात महिला आणि मुलांना विमानातून उतरवण्यात आलं. तसेच एका मृत पॅसेंजरचा मृतदेहही विमानातून बाहेर काढण्यात आला.  

दरम्यान, विमान अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने गेलेल्या जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या एका लाल सुटकेसबाबतही मानवेंद्र सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारकडून काही पर्याय शोधण्यात येत होते. काही तोडगा निघेल का? याची चाचपणी करण्यात येत होती. पैशांच्या देवाणघेवामीचा विषय नव्हता. तसेच लाल सुटकेस नेण्यासारखंही काही घडलं नव्हतं. एका राज्यसभा खासदारांने अशा प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या. तेव्हापासूनच लाल सुटकेसवरून टीका केली जात आहे.  मी स्वत: माझ्या वडिलांना सोडण्यासाठी विमानतळावर गेलो होते. ते एक ब्रिफकेस नेहमी स्वत:जवळ बाळगायचे. त्यामध्ये पूजेचं साहित्य आणि माळा असायची. मात्र ती ब्रिफकेससुद्धा त्यांनी त्या दिवशी नेली नव्हती. आता बोलणारे काहीही बोलतील, असं ते म्हणाले. 

मानवेंद्र सिंह यांनी पुढे सांगितलं की, विमानाच्या अपहरणानंतर जेव्हा दहशतवादी विमान कंधारला घेऊन गेले तेव्हा दहशतद्यांच्या सुटकेसोबत वाटाघाटी करण्यासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांनेही यावं, म्हणून बोलावणं आलं होतं. त्यावेळी अशी जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नव्हतं. अखेरीस परराष्ट्रमंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. हाच धर्म होता, असे ते म्हणाले.  

टॅग्स :airplaneविमानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतterroristदहशतवादीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा