शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:31 IST

IC 814 Kandahar hijack: नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.

नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी ते अपहरणकांड आणि जसवंत सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मानवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आयसी ८१४ या अपहरण झालेल्या प्रवासी विमानाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारताच्या एका विमानानं हवेत उड्डाण केलं होतं. त्यामध्ये एनएसजी कमांडो तैनात होते. जर दुबईने परवानगी दिली असती तर भारताने तिथेच कारवाई केली असती. मात्र दुबईकडून तशी परवानगी मिळाली नाही. मात्र भारताने अपहरणकर्त्यांवर आणलेला दबाव काही प्रमाणात उपयोगाला आला. तसेच विमानात इंधन भरण्याच्या मोबदल्यात महिला आणि मुलांना विमानातून उतरवण्यात आलं. तसेच एका मृत पॅसेंजरचा मृतदेहही विमानातून बाहेर काढण्यात आला.  

दरम्यान, विमान अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने गेलेल्या जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या एका लाल सुटकेसबाबतही मानवेंद्र सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारकडून काही पर्याय शोधण्यात येत होते. काही तोडगा निघेल का? याची चाचपणी करण्यात येत होती. पैशांच्या देवाणघेवामीचा विषय नव्हता. तसेच लाल सुटकेस नेण्यासारखंही काही घडलं नव्हतं. एका राज्यसभा खासदारांने अशा प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या. तेव्हापासूनच लाल सुटकेसवरून टीका केली जात आहे.  मी स्वत: माझ्या वडिलांना सोडण्यासाठी विमानतळावर गेलो होते. ते एक ब्रिफकेस नेहमी स्वत:जवळ बाळगायचे. त्यामध्ये पूजेचं साहित्य आणि माळा असायची. मात्र ती ब्रिफकेससुद्धा त्यांनी त्या दिवशी नेली नव्हती. आता बोलणारे काहीही बोलतील, असं ते म्हणाले. 

मानवेंद्र सिंह यांनी पुढे सांगितलं की, विमानाच्या अपहरणानंतर जेव्हा दहशतवादी विमान कंधारला घेऊन गेले तेव्हा दहशतद्यांच्या सुटकेसोबत वाटाघाटी करण्यासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांनेही यावं, म्हणून बोलावणं आलं होतं. त्यावेळी अशी जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नव्हतं. अखेरीस परराष्ट्रमंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. हाच धर्म होता, असे ते म्हणाले.  

टॅग्स :airplaneविमानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतterroristदहशतवादीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा