शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:31 IST

IC 814 Kandahar hijack: नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.

नुकत्याच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘IC ८१४ द कंधार हायजॅक’ या वेबसिरीजमुळे १९९९ साली झालेल्या या विमान अपहरणकांडाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तडजोडी करण्यासाठी गेलेले तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या लाल सुटकेसवरूनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी ते अपहरणकांड आणि जसवंत सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मानवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आयसी ८१४ या अपहरण झालेल्या प्रवासी विमानाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारताच्या एका विमानानं हवेत उड्डाण केलं होतं. त्यामध्ये एनएसजी कमांडो तैनात होते. जर दुबईने परवानगी दिली असती तर भारताने तिथेच कारवाई केली असती. मात्र दुबईकडून तशी परवानगी मिळाली नाही. मात्र भारताने अपहरणकर्त्यांवर आणलेला दबाव काही प्रमाणात उपयोगाला आला. तसेच विमानात इंधन भरण्याच्या मोबदल्यात महिला आणि मुलांना विमानातून उतरवण्यात आलं. तसेच एका मृत पॅसेंजरचा मृतदेहही विमानातून बाहेर काढण्यात आला.  

दरम्यान, विमान अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने गेलेल्या जसवंत सिंह यांच्यासोबत असलेल्या एका लाल सुटकेसबाबतही मानवेंद्र सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारकडून काही पर्याय शोधण्यात येत होते. काही तोडगा निघेल का? याची चाचपणी करण्यात येत होती. पैशांच्या देवाणघेवामीचा विषय नव्हता. तसेच लाल सुटकेस नेण्यासारखंही काही घडलं नव्हतं. एका राज्यसभा खासदारांने अशा प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या. तेव्हापासूनच लाल सुटकेसवरून टीका केली जात आहे.  मी स्वत: माझ्या वडिलांना सोडण्यासाठी विमानतळावर गेलो होते. ते एक ब्रिफकेस नेहमी स्वत:जवळ बाळगायचे. त्यामध्ये पूजेचं साहित्य आणि माळा असायची. मात्र ती ब्रिफकेससुद्धा त्यांनी त्या दिवशी नेली नव्हती. आता बोलणारे काहीही बोलतील, असं ते म्हणाले. 

मानवेंद्र सिंह यांनी पुढे सांगितलं की, विमानाच्या अपहरणानंतर जेव्हा दहशतवादी विमान कंधारला घेऊन गेले तेव्हा दहशतद्यांच्या सुटकेसोबत वाटाघाटी करण्यासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांनेही यावं, म्हणून बोलावणं आलं होतं. त्यावेळी अशी जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नव्हतं. अखेरीस परराष्ट्रमंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. हाच धर्म होता, असे ते म्हणाले.  

टॅग्स :airplaneविमानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतterroristदहशतवादीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा