शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:45 IST

Maharashtra Political Crisis : सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी ५ वाजता सुनावणी सुरु झाली असून शिवसेनेची बाजू वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रथम युक्तिवादास सुरुवात केली. मला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत असं शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.  उद्या बंडखोर आमदारांना मतदान करण्यास देणं हे लोकशाहीविरोधात असल्याचं सिंघवी सर्वोच्च न्यायालयात म्हणाले.  

सर्वोच्च न्यायालयात  राज्यपालांचे पत्र त्यांच्या कार्यालयातून व्हायरल झालं यावर सिंघवी यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यपालांनी जलद गतीने घाईघाईने निर्णय घेतला. आम्हाला अधिक कालावधीची गरज आहे. राष्ट्रवादीचे २ आमदार कोरोनाबाधित असून आम्हाला पुरेसा अवधी मिळालेला नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबाबत अद्याप निर्णय नाही. असं असून देखील बहुमत चाचणी कशी काय? ,११ जुलैनंतर अपात्रतेबाबत निर्णय येणार असून त्यानंतर बहुमताचा आकडा कमी जास्त होऊ शकतो, असे सिंघवी युक्तिवाद करताना म्हणाले.

शिंदे गटाची बाजूने नीरज कौल तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बाजू वकील राजीव धवन मांडत आहेत. बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच न्या. सूर्य कांत यांनी बहुमत चाचणी कधी करू शकतात याबाबत काही नियम आहे का? अशी विचारणा सिंघवी यांना केली. दोन बहुमत चाचण्यांमध्ये सहा महिन्याच्या कालावधी गरजेचं आहे, असे सिंघवी म्हणाले. वैध बहुमत चाचणी होण्यासाठी अधिक कालावधीची गरज आहे. कारण १२ जुलैला आमदार अपात्र ठरले, तर अपात्र आमदारांचे मत अवैध ठरेल असे सिंघवी युक्तिवाद करताना म्हणाले. सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणVotingमतदानMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ