शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

काय हे! यज्ञ प्रदूषण मुक्तीच्या नावाने... जाळणार 50 हजार किलो लाकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 3:42 PM

वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे.

मेरठ: काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या नादात मूळ उद्दिष्टालाच कसा हरताळ फासला जातो, याचे प्रत्यंतर नुकतेच मेरठमध्ये आले. याठिकाणी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या उत्साहात यंदा प्रदूषण मुक्तीसाठी विशेष यज्ञ करण्यात येणार आहे. मात्र, यामधील हास्यास्पद बाब म्हणजे आयोजकांकडून या यज्ञासाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 50 हजार किलो लाकूड समिधा म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हा यज्ञ प्रदूषण मुक्तीसाठी आहे की अधिक प्रदूषण करण्यासाठी आहे, असा प्रश्न काहीजणांकडून विचारण्यात येत आहे. सध्याच्या घडीला देशातील प्रमुख शहरांमध्ये होणारे प्रदूषण ही चिंतेची बाब आहे.  त्यासाठी मेरठच्या श्री अयुतचंडी महायज्ञ समितीकडून प्रदूषण मुक्तीच्या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे. यासाठी एका मोठ्या मंडपात अनेक यज्ञकुंडे तयार करण्यात आली आहेत. साहजिकच या यज्ञासाठी मोठ्याप्रमाणावर समिधा लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी आंब्याच्या झाडाची तब्बल 500 किलो लाकडं या ठिकाणी आणण्यात आली आहेत. प्रदूषण मुक्तीच्या नावाने करण्यात येणाऱ्या या यज्ञामुळे मोठ्याप्रमाणावर हवेचे प्रदूषण होऊ शकते, ही बाब आयोजकांच्या लक्षातच आलेली नाही. यामुळे आता सोशल मीडियावरून या यज्ञाच्या आयोजकांवर टीका व्हायला सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी 'लॅन्सेट'ने जाहीर केलेल्या अहवालात, भारतातील वाढते वायू प्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यामुळे दिल्लीकरांचे जगणे मुश्कील झाले होते. त्यामुळे मेरठमधील हा यज्ञ म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर, अशी अवस्था असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणUttar Pradeshउत्तर प्रदेश