शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:13 IST

Operation Sindoor: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरबाबतच्या चर्चेला सुरुवात करताना पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला दिली.

लोकसभेमध्ये सकाळपासून विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळानंतर अखेर आज दुपारी २ वाजल्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली असून, यादरम्यान, त्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला दिली. भारतीय सैन्यदलांनी ६-७ मेच्या रात्री भारतीय सैन्यदलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ही एक ऐतिहासिक कारवाई असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारताने केवळ पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना लक्ष्य करून ही कारवाई केली. तसेत त्यामध्ये सुमारे १०० दहशतवादी, त्यांच्ये ट्रेनर आणि हँडलर मारले गेले अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली. 

लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात करताना राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, पहलगामधमध्ये दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली होती. पहलगाम हल्ला हा अमानवीयतेचं मोठं उदाहरण आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना निर्णायक कारवाईची सूट दिली. त्यानंतर भारतीय सैन्यदलाने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर ही ऐतिहासिक कारवाई केली. यादरम्यान, आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. सैन्यदलांनी आमच्या माता-भगिनींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला घेतला. मी खूप जपून बोलतोय. या कारवाईमध्ये १०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे हँडलर मारले गेले. मृतांची संख्या ही अधिक असून, शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. 

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ही कारवाई आगळीक करणारी नव्हती. मात्र पाकिस्तानने या कारवाईनंतर आमच्या सैनिकी केंद्रांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही हे हल्ले उधळून लावले. तसेच पाकिस्तानकडून झालेल्या या आगळिकीला आम्ही अगदी तोलून मापून प्रत्युत्तर दिले. आमची संपूर्ण कारवाई स्वसंरक्षणाची होती. पाकिस्तानने हल्ले करताना क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या हत्यारांचा वापर केला. आमचे सैनिकी तळ त्यांच्या निशाण्यावर होते. मात्र आमच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी हे हल्ले निष्फळ ठरवले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आमच्याकडून झालेली कारवाई ही साहसी आणि प्रभावी होती. तसेच या मोहिमेला आमच्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडले.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरला स्थगित करण्याबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नालाही राजनाथ सिंह यांनी यावेळी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा पाकिस्तानने अनेक वर्षांपासून पोसलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना नष्ट करणे हा होता. त्यामुळे आमच्या सैन्य दलांनी केवळ भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांनाच लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा युद्धाला सुरुवात करण्याचा नव्हता. दरम्यान, १० मे रोजी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाईतळांवरील धावपट्ट्यांवर मोठा हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने पराभव मान्य करून युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर हे सध्या केवळ स्थगित करण्यात आलं आहे. आता पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केली तर ही कारवाई पुन्हा सुरू केली जाईल.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहlok sabhaलोकसभाIndiaभारतPakistanपाकिस्तान