शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:13 IST

Operation Sindoor: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरबाबतच्या चर्चेला सुरुवात करताना पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला दिली.

लोकसभेमध्ये सकाळपासून विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळानंतर अखेर आज दुपारी २ वाजल्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात केली असून, यादरम्यान, त्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाबाबत महत्त्वपूर्ण माहिती सभागृहाला दिली. भारतीय सैन्यदलांनी ६-७ मेच्या रात्री भारतीय सैन्यदलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ही एक ऐतिहासिक कारवाई असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारताने केवळ पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना लक्ष्य करून ही कारवाई केली. तसेत त्यामध्ये सुमारे १०० दहशतवादी, त्यांच्ये ट्रेनर आणि हँडलर मारले गेले अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली. 

लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात करताना राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, पहलगामधमध्ये दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली होती. पहलगाम हल्ला हा अमानवीयतेचं मोठं उदाहरण आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना निर्णायक कारवाईची सूट दिली. त्यानंतर भारतीय सैन्यदलाने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर ही ऐतिहासिक कारवाई केली. यादरम्यान, आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. सैन्यदलांनी आमच्या माता-भगिनींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला घेतला. मी खूप जपून बोलतोय. या कारवाईमध्ये १०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे हँडलर मारले गेले. मृतांची संख्या ही अधिक असून, शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. 

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ही कारवाई आगळीक करणारी नव्हती. मात्र पाकिस्तानने या कारवाईनंतर आमच्या सैनिकी केंद्रांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही हे हल्ले उधळून लावले. तसेच पाकिस्तानकडून झालेल्या या आगळिकीला आम्ही अगदी तोलून मापून प्रत्युत्तर दिले. आमची संपूर्ण कारवाई स्वसंरक्षणाची होती. पाकिस्तानने हल्ले करताना क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या हत्यारांचा वापर केला. आमचे सैनिकी तळ त्यांच्या निशाण्यावर होते. मात्र आमच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी हे हल्ले निष्फळ ठरवले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आमच्याकडून झालेली कारवाई ही साहसी आणि प्रभावी होती. तसेच या मोहिमेला आमच्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडले.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरला स्थगित करण्याबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नालाही राजनाथ सिंह यांनी यावेळी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा पाकिस्तानने अनेक वर्षांपासून पोसलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना नष्ट करणे हा होता. त्यामुळे आमच्या सैन्य दलांनी केवळ भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांनाच लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा युद्धाला सुरुवात करण्याचा नव्हता. दरम्यान, १० मे रोजी सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाईतळांवरील धावपट्ट्यांवर मोठा हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने पराभव मान्य करून युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर हे सध्या केवळ स्थगित करण्यात आलं आहे. आता पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केली तर ही कारवाई पुन्हा सुरू केली जाईल.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहlok sabhaलोकसभाIndiaभारतPakistanपाकिस्तान