शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून केंद्र अ‍ॅक्शन मोडवर, गृह मंत्रालयानं ममता सरकारला 3 दिवसांत मागितला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:43 IST

गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना संपूर्ण घटनेचा अहवाल 3 दिवसांत पाठवायला सांगितला आहे.

रामनवमी शोभायात्रेदरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता केंद्रातील मोदी सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ममता सरकारकडून रामनवमीच्या मुहुर्तावर झालेल्या दंगली आणि खराब कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात रिपोर्ट मागवला आहे. गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना संपूर्ण घटनेचा अहवाल 3 दिवसांत पाठवायला सांगितला आहे. बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे.

या पत्रानंतर गृह मंत्रालयाने हा अहवाल मागवला आहे. तत्पूर्वी, गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांच्यासोबत चर्चा करून गुरुवारी हावडा येथे रामनवमी शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. 

हावडा आणि हुगळीमध्ये झाला हिंसाचार -राज्यपालांनी अमित शहा यांना हिंसाचार आणि सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली आहे. हावडा येथे जमावाने मठ्या प्रमाणावर धुडगूस घातला, वाहने जाळली, दगडफेक केली आणि दुकानांचीही तोडफोड केली. यानंतर संबंधित भागांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांच्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. हावडानंतर रविवारी हुगळीत हिंसाचार उफाळून आला होता. 

सुकांत यांनी काय म्हटलंय पत्रात? -सुकांत मजुमदार यांनी आपल्या पत्रात लिहिले, हुगळी जिल्ह्यातही भाजपच्या मिरवणुकीतही गोंधळ घालण्यात आला.  यानंतर रेल्वे स्थानकांवर जोरदार दगडफेक झाली. यानंतर रेल्वे सेवा निलंबित करण्यात आली आणि हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसी आणि त्यांच्या समर्थनाशिवाय सुरू ठेवले जाऊ शकत नव्हते. याशिवाय, भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुकांत मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यातील हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांचीही भेट घेतली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी