शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:26 IST

पोलिसांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ता इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह एका खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे दोन्ही हात मागून बांधलेले होते. भाजप कार्यकर्ता इंद्रजीतचा मृतदेह जेथे सापडला ती इमारत बऱ्याच दिवसांपासून रिकामी पडून आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला तीन महिने होऊन गेले आहेत. तरीही येथील हिंसाचाराचा खेल सुरू आहे. आता राज्यातील दोन वेगवेगळ्या भागांत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मंगळवारी हे मृतदेह सापडल्यानंतर भाजपने टीएमसीवर आरोप केला आहे. की, टीएमसीचा आश्रय असलेल्या गुंडांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. तर दुसरीकडे टीएमसीने भाजपचे हे आरोप फेटाळले आहेत.

यासंदर्भात बोलताना पोलिसांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ता इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह एका खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे दोन्ही हात मागून बांधलेले होते. भाजप कार्यकर्ता इंद्रजीतचा मृतदेह जेथे सापडला ती इमारत बऱ्याच दिवसांपासून रिकामी पडून आहे.

बीरभूम जिल्ह्यातील खोइरासोल परिसरात मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली असून राजकीय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी म्हटले आहे, की इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी हे खुनाचे प्रकरण असल्याचे दिसते. पण हत्या कशी झाली आणि कोणत्या परिस्थितीत झाली, हे चौकशीनंतरच कळेल. टीएमसीचा आश्रय असलेल्या गुन्हेगारांनीच त्यांची हत्या केल्याचे स्थानिक भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

बनावट सरकारी नोकरी घोटाळा; ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; दिला असा आदेश

यासंदर्भात, सूत्रधारच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तो सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होता. काही स्थानिक लोकांशी त्याचे वैयक्तिक भांडण असल्याचेही बोलले जात आहे.

याशिवाय, आणखी एक भाजप कार्यकर्ता 45 वर्षीय तपन खातुआ यांचा मृतदेह पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा भागात असलेल्या एका तलावात सापडला. त्याच्या मृत्यूसाठी भाजप आणि खटुआच्या कुटुंबीयांनी टीएमसीलाच जबाबदार धरले आहे. टीएमसीच्या स्थानिक नेतृत्वाने हे आरोप फेटाळले आहेत. उलट, टीएमसी नेत्यांनी भाजपवर दुर्दैवी घटनांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत आदेश राखून ठेवला आहे-TMCचे म्हणणे आहे की, सूत्रधारची हत्या वैयक्तिक भांडणातून झाली, तर तपनने आत्महत्या केली. सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. पण एकाच दिवसात दोन मृतदेह सापडल्याने राजकीय तणाव वाढला आहे. आधीच भाजप आणि टीएमसीमधील संबंध चांगले नाहीत. दरम्यान, मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांची अंतिम सुनावणी घेतली आणि आदेश राखून ठेवला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिसMamata Banerjeeममता बॅनर्जी