शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:48 IST

West Bengal Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा२०२४ लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतीलतृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची टीका

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. (west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign)

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यावर यशवंत सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

म्हणून बंगालमधील जनता दुखावली गेली

पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर टीकेला सुरुवात केली. मात्र, एका मर्यादेनंतर बंगाली जनतेला ही टीका आवडली नाही. ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक आरोपांमुळे बंगाली जनता दुखावली गेली आणि त्याचेच फळ भाजपला या निवडणुकीत दिसले. जनतेने भाजपला नाकारले, अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी दिली. या विधानसभा निवडणुकीचे पडसाद २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतील, असा दावाही सिन्हा यांनी यावेळी केला. 

ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

रडीचा डाव!

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असे ट्विट शरद पवार यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असेही शरद पवार यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसYashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण