शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:48 IST

West Bengal Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा२०२४ लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतीलतृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची टीका

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. (west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign)

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यावर यशवंत सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

म्हणून बंगालमधील जनता दुखावली गेली

पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर टीकेला सुरुवात केली. मात्र, एका मर्यादेनंतर बंगाली जनतेला ही टीका आवडली नाही. ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक आरोपांमुळे बंगाली जनता दुखावली गेली आणि त्याचेच फळ भाजपला या निवडणुकीत दिसले. जनतेने भाजपला नाकारले, अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी दिली. या विधानसभा निवडणुकीचे पडसाद २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतील, असा दावाही सिन्हा यांनी यावेळी केला. 

ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

रडीचा डाव!

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असे ट्विट शरद पवार यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असेही शरद पवार यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसYashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण