शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:48 IST

West Bengal Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा२०२४ लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतीलतृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची टीका

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. (west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign)

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यावर यशवंत सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

म्हणून बंगालमधील जनता दुखावली गेली

पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर टीकेला सुरुवात केली. मात्र, एका मर्यादेनंतर बंगाली जनतेला ही टीका आवडली नाही. ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक आरोपांमुळे बंगाली जनता दुखावली गेली आणि त्याचेच फळ भाजपला या निवडणुकीत दिसले. जनतेने भाजपला नाकारले, अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी दिली. या विधानसभा निवडणुकीचे पडसाद २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतील, असा दावाही सिन्हा यांनी यावेळी केला. 

ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

रडीचा डाव!

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असे ट्विट शरद पवार यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असेही शरद पवार यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसYashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण