शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

"माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही", नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:44 IST

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यासोबतच या बैठकीत त्यांना फक्त ५ मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत आज नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होत आहे. या बैठकीत काही राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले आहेत. मात्र, बिगर भाजपशासित राज्ये आणि विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांनीही या बैठकीला हजेरी लावली. मात्र, या नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या. बाहेर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यासोबतच या बैठकीत त्यांना फक्त ५ मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, 'केंद्र सरकारनं राज्य सरकारांशी भेदभाव करू नये. मला बोलायचं होतं, पण मला फक्त ५ मिनिटं बोलू दिलं. माझ्या आधीचे लोक १० ते २० मिनिटं बोलले. या बैठकीत विरोधी पक्षातील मी एकटीच होते, पण तरीही मला बोलू दिलं गेलं नाही. हे अपमानास्पद आहे."

पुढे त्या म्हणाल्या, "मी बोलत होते, तेवढ्यात माझा माईक बंद करण्यात आला. मी म्हणाले, तुम्ही मला का थांबवलं, तुम्ही भेदभाव का करताय? मी बैठकीत सहभागी होत आहे, तुम्ही खुश व्हायला पाहिजे, त्याऐवजी तुम्ही तुमची पार्टी, तुमच्या सरकारला अधिक वाव देत आहात आणि तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात, हा केवळ बंगालचाच नाही तर सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे." दरम्यान, केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांचा माईक बंद झाला नव्हता, त्यांची बोलण्याची वेळ संपली होती.

याआधीही सरकारवर साधला होता निशाणादरम्यान, नीती आयोगाच्या बैठकीत सामील होण्याआधी सुद्धा ममत बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. २०२४ मध्ये मित्रपक्षांच्या मदतीनं भाजप सत्तेत आलं. त्यामुळं यंदाच्या बजेटमध्ये भाजपनं त्यांना झुकतं माप दिलं. राजकीयदृष्ट्या मजबुरीमुळं पक्षपाती बजेट सादर केलं. ज्यातून विरोधकांचं सरकार असलेल्या राज्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. तसंच, नीती आयोग हटवा, नियोजन आयोग पुन्हा आणा. नियोजन आयोगाची रचना होती त्यातून देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कल्पना होती. नीती आयोगाला कोणतेही अधिकार नाहीत. हे राज्य सरकारांशी समन्वयानं काम करत नाही, असा आरोपही ममता बॅनर्जींनी केला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNIti Ayogनिती आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा