शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 11:15 AM

भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल.

कोलकाता - केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यांपैकी एक भवानीपूरची जागा आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनिवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल. कारण भाजप ममतांच्या विरोधात मोठ्या चेहऱ्यांवर डाव लावण्याचा विचार करत आहे. (West Bengal BJP decide candidate against cm mamata banerjee in bhabanipur bypoll)

माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपाकडून अभिनेत्याचे नेते झालेले रुद्रनील घोष, माजी राज्यपाल तथागत रॉय, टीएमसीचे माजी खासदार दिनेश त्रिवेदी आणि भाजप नेते डॉ. अनिर्बन गांगुली यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक विचार होत आहे. ममता 2011 आणि 2016 च्या निवडणुकीत, भवानीपूरमधून विजयी झाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने भवानीपूर, समशेरगंज आणि जांगीपूर जागांवरील पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ममता बॅनर्जी भवानीपूरमधून, झाकीर हुसेन जांगीपूरमधून तर अमीरुल इस्लाम समशेरगंजमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

काँग्रेस आणि डाव्यांमध्येही उमेदवारांबाबत मंथन सुरू -यातच, काँग्रेसनेही सोमवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॉंग्रेस पोटनिवडणुकांसाठी आपले उमेदवार जाहीर करेल अथवा डाव्यांसोबत आघाडीची घोषणा करेल. महत्वाचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून रुद्रनिल घोष हे भाजपचे उमेदवार होते. मात्र, टीएमसीच्या सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर, सोहनदेब यांनी ममतांसाठी ही जागा खाली केली होती.

भवानीपूर जागेसाठी 30 सप्टेंबरला मतदान -निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरला बंगालमध्ये पोटनिवडणूक होणार आहे आणि 3 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पश्चिम बंगालमधील 3 विधानसभा जागांसाठी 13 सप्टेंबरपर्यंत नामांकन केले जाईल. तर 16 सप्टेंबर ही नामांकन मागे घेतले शेवटची तारीख असेल.

"माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"

ममतांची खुर्ची पणाला - ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टीकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना 5 नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक