शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVirus: केंद्रीय दलांनी बंगाल सोडावे; ममता दीदींनी केले मद्रास हायकोर्टाच्या आदेशाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 22:10 IST

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जींची निवडणूक आयोगावर टीकामद्रास उच्च न्यायालयाचे केले स्वागतनिवडणूक आयोग जबाबदारी झटकू शकत नाही - ममता दीदी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता अखेरचा टप्पा राहिला असून, २ मे रोजी पाचही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेकदा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करत, केंद्रीय दलांमुळे कोरोना पसरतोय, असा दावाही त्यांनी केली. (west bengal assembly election 2021 mamata banerjee welcome madras high court decision and criticized election commission)

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तरीही पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा टीका केली आहे. निवडणूक आयोगासह अन्य केंद्रीय दलांनी बंगालमधून निघून जावे. यांमुळेच कोरोना अधिक फैलावत आहे, असा पुनरुच्चार ममता दीदींनी केला.

आता सर्वोच्च न्यायालयातही होणार ६० बेड्सचे कोव्हिड सेंटर; सरन्यायाधीशांनी दिली मंजुरी

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

ममता बॅनर्जी यांनी मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशाचे स्वागत केले असून, निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी निवडणूक आयोग कारणीभूत असून, आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

“पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले

एका याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालायने राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला. देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे म्हणत  निवडणूक आयोगाला फटकारले. तसेच, न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून असल्याने न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे.

कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा  

दरम्यान, कोरोनाच्या या गंभीर काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. एवढेच नव्हे, तर घरातील सदस्यांनी कुटुंबांसोबत घरबसल्या मास्क घाला. मास्क घालणे अतिशय महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणालाही घरी बोलावू नका, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHigh Courtउच्च न्यायालयPoliticsराजकारण