शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आम्हाला मजबूत, विरोधकांना ‘मजबूर सरकार’ हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 05:51 IST

पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर घणाघात; खरी लढाई परिवार विरोधात राज्यघटना

नवी दिल्ली : देशाला मजबूत सरकार मिळावे, असे भाजपाला वाटते, परंतु विरोधकांना मात्र केंद्रात मजबूर (लाचार) सरकार हवे आहे, ज्यामुळे त्यांना देशाला लुटता येते, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावर भरलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी केली. देशात पहिल्यांदाच असे सरकार आहे, ज्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, असा दावा मोदी यांनी केला. भ्रष्टाचार न करताही देश चालविता येतो, हे आम्ही दाखवून दिले, असेही ते म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, देशाच्या विकासातील काँग्रेस हा प्रमुख अडथळा आहे. घोटाळे आणि भ्रष्टाचारामुळे यूपीए सरकारच्या काळात देशाची महत्त्वाची १० वर्षे वाया गेली. हताश झालेले विरोधक माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत, परंतु त्यामुळे मी अजिबात मागे हटणार नाही.

गांधी परिवारावर टीका करताना मोदी म्हणाले की, जे स्वत: जामिनावर बाहेर आहेत, देशाचा न्याय आणि कायदा याचा मान राखत नाहीत, त्यांच्याकडून देशाचा सन्मान केला जाईल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. काँग्रेससाठी आरबीआय, कॅग, सीबीआय या सर्व संस्था क्षुल्लक आहेत. केवळ परिवार हेच सर्वस्व आहे. परिवाराला विरोध करणारे सगळे चूक आहेत. यापुढे खरी लढाई परिवार आणि राज्यघटना यांच्यामध्ये आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांनी या संस्थांचा वापर करून मला संपविण्याचा प्रयत्न केला. माझी सलग नऊ तास चौकशी केली. त्यांनी अमित शहा यांना तुरुंगात टाकले.

अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी मोदी म्हणाले की, काँग्रेसने वकिलांकडून राम मंदिर बांधण्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी बेछूट आरोप करीत काँग्रेसने देशाच्या सरन्यायाधीशांवर महाभियोग आणण्याची तयारी चालविली होती. देशहिताच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याला विरोध करण्याची काँग्रेसची मानसिकता यातून दिसून येते. सरकारने केलेल्या कामांबाबत मोदी म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखाली देश पारदर्शकतेच्या दिशेने जात आहे. २०१४ आधी देशात सामान्य माणूस भरीत असलेल्या कराला काहीही किंमत नव्हती. आता स्थिती बदलली आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन, चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या की त्यांना कुणावर अवलंबून रहावे लागत नाही.

संसदेच्या अखेरच्या अधिवेशनात सर्व वर्गातील आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण मोदी सरकारने लागू केले. याबाबत मोदी म्हणाले की, या आरक्षणामुळे देशात समानता आणण्यास मोठी मदत मिळेल. यामुळे दुर्बल घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. हे देताना सरकारने अन्य कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावलेला नाही.

नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना कार्यकर्ते त्यांच्या नावाचा जयघोष करीत होते. मोदी यांच्या भाषणचा एकूण नूर पाहता त्यांनी काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित केली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी जोरदार कामाला लागा, असा संदेशच त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिला आहे.विरोधकांच्या आघाड्या तकलादूउत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केल्याची घोषणा आज सकाळीच झाली. याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या आघाड्या अजिबात टिकू शकणाऱ्या नाहीत. तेलंगणात काँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशमशी आघाडी केली परंतु प्रत्यक्षात तिथे तेलंगण राष्ट्रसमितीची सरशी झाली. कर्नाटकात काँग्रेसने जनता दल (सेक्युलर) यांच्यासोबत आघाडी करून त्यांना मुख्यमंत्रिपद दिले परंतु आज मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उघडपणे सांगत आहेत की, काँग्रेस त्यांना कारकूनाप्रमाणे वागवले जात आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये स्थापन झालेल्या नवीन सरकारमध्येही आता अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये शेतकºयांना कर्जमाफी दिली. कारण अन्नदात्या शेतकºयांना काँग्रेस केवळ मतपेढी मानते. परंतु या शेतकºयांना हे ठाऊक आहे की शेतमालाला दिला जाणारा चांगला हमीभाव अजूनही कागदावरच आहे. पण आमचे सरकार सत्तेत येताच आम्ही शेतकºयांना हमीभाव वाढवून दिला.सेवक हवा की...?तुम्हाला १८ तास काम करणारा सेवक हवा आहे की, अडचणीच्या काळात देशाला गरज असताना सुट्टीवर जाणारा नेता हवा आहे, असा सवाल मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता विचारला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस