शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्यामुळेच जिंकलो असं कुणी समजू नये', अमित शाहांनी भाजप नेत्यांचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:52 IST

बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतली. शाह यांनी त्यांना त्यांच्या विजयाबद्दल अहंकार बाळगू नका असा सल्ला दिला.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार भाजप नेत्यांना अहंकारी होऊ नका असा सल्ला दिला. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीतील भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बिहार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत पक्ष आणि आघाडीच्या भरघोस विजयावर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना शाह सल्ला दिला. हा विजय सामूहिक विजय आहे. कोणीही अहंकार बाळगू नका असा सल्ला दिला.

गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता प्रत्येक विदेशी नागरिकाला..."

अमित शहा म्हणाले, निवडणुकीत सर्व नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. निवडणुकीत एक टक्का योगदान देखील महत्त्वाचे आहे, परंतु कोणत्याही नेत्याने असा विचार करू नये की विजय त्यांच्यामुळेच झाला आहे. अशा विचारसरणीमुळे अहंकार निर्माण होतो."

शाह यांनी नेत्यांना सल्ला दिला

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील आगामी निवडणुका लक्षात घेता, शहा यांनी बिहारच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना सांगितले की, प्रत्येकाने तयार राहावे आणि पक्षासाठी काम करण्यासाठी कोणालाही कुठेही पाठवता येईल. त्यांनी "जिथे कमी आहे, तिथे आपण आहोत" हा मंत्र दिला आणि सांगितले की जिथे संघटना कमकुवत आहे, तिथे आपण जाऊन ती मजबूत केली पाहिजे, असंही शाह म्हणाले.

बिहार निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यांनी १०१ जागा लढवल्या आणि ८९ उमेदवार जिंकले. १०१ जागा लढवणारे जेडीयूचे ८५ उमेदवारही जिंकले. एनडीएने एकूण २०२ आमदार जिंकले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Assume Victory Was Because of You, Shah Tells BJP Leaders

Web Summary : Amit Shah cautioned Bihar BJP leaders against arrogance after their election victory. He emphasized collective effort and the importance of humility, advising them to prepare for upcoming elections in other states and strengthen the party at every level.
टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाBiharबिहारElectionनिवडणूक 2024