शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 16:44 IST

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत.

ठळक मुद्देभारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे.

मुंबई - अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. त्यापैकी, काही अफगानी नागरिक भारतातही आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथील घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, केंद्र सरकारला मोलाचा सल्लाही दिलाय.   

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत. त्यामुळे, आता आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. हुकूमशाहीने आलेल्या तालिबानींनी शांती राहावी, आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे. लोकांना विश्वास द्यायचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आशा धरुयात की यात काही सत्यता असेल, असेही पवार यांनी म्हटले. 

भारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे, आपल्या विदेशनितीचा आढावा घेण्याची वेळ आल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, हा संवेदनशील विषय असल्यानं यावर मी अधिक बोलणार नाही. मात्र, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने सरकारला यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल, असेही पवार यांनी म्हटले.  

अमेरिकेनंतर अफगानिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन पलायन केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अब्जावधी रुपये खर्च करून गेली २० वर्षे तालिबानला (Taliban) सत्तेपासून लांब ठेवले होते. तालिबानने बलाढ्य अशा अमेरिकेलाही हरविले आहे आणि पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन करण्याच्या टप्प्यात आहे. तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर (mullah abdul ghani baradar) हा अफगानचा पुढील राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता आहे. मात्र, तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. 

भारत पाकिस्तान वादात हस्तक्षेप नाही - तालिबान

तालिबानकडून भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत, असे म्हटलं आहे. तसेच, अफगाणिस्तानात भारतातील उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुरक्षित असून कुणालाही देश सोडून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात तालिबानचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. दोन्ही देशांमधील समस्या ही त्यांची स्वत:ची आहे. त्यामुळे, यात हस्तक्षेप असणार नाही, असेही तालिबानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त दिले आहे. 

गनी यांची भावूक पोस्ट

"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं

"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानNarendra Modiनरेंद्र मोदी