शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 16:44 IST

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत.

ठळक मुद्देभारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे.

मुंबई - अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. त्यापैकी, काही अफगानी नागरिक भारतातही आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथील घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, केंद्र सरकारला मोलाचा सल्लाही दिलाय.   

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत. त्यामुळे, आता आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. हुकूमशाहीने आलेल्या तालिबानींनी शांती राहावी, आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे. लोकांना विश्वास द्यायचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आशा धरुयात की यात काही सत्यता असेल, असेही पवार यांनी म्हटले. 

भारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे, आपल्या विदेशनितीचा आढावा घेण्याची वेळ आल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, हा संवेदनशील विषय असल्यानं यावर मी अधिक बोलणार नाही. मात्र, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने सरकारला यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल, असेही पवार यांनी म्हटले.  

अमेरिकेनंतर अफगानिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन पलायन केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अब्जावधी रुपये खर्च करून गेली २० वर्षे तालिबानला (Taliban) सत्तेपासून लांब ठेवले होते. तालिबानने बलाढ्य अशा अमेरिकेलाही हरविले आहे आणि पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन करण्याच्या टप्प्यात आहे. तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर (mullah abdul ghani baradar) हा अफगानचा पुढील राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता आहे. मात्र, तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. 

भारत पाकिस्तान वादात हस्तक्षेप नाही - तालिबान

तालिबानकडून भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत, असे म्हटलं आहे. तसेच, अफगाणिस्तानात भारतातील उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुरक्षित असून कुणालाही देश सोडून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात तालिबानचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. दोन्ही देशांमधील समस्या ही त्यांची स्वत:ची आहे. त्यामुळे, यात हस्तक्षेप असणार नाही, असेही तालिबानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त दिले आहे. 

गनी यांची भावूक पोस्ट

"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं

"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानNarendra Modiनरेंद्र मोदी