शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

थेंब थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान, भारताच्या 'या' निर्णयाचा पाकला बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 4:35 PM

येत्या काही काळात पाकिस्तानला पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तडफडावं लागणार आहे.

नवी दिल्ली- येत्या काही काळात पाकिस्तानला पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तडफडावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)सह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रिसर्च रिपोर्टमधून उघड झालं आहे. रिपोर्टनुसार, 2025पर्यंत पाकिस्तानमध्ये पाण्याशिवाय दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या स्थानिक वर्तमानपत्रांतूनही हे भाकित वर्तवण्यात आलं आहे.पाकिस्तानमधलं ऊर्दू वृत्तपत्र 'जंग'च्या नुसार, जलतज्ज्ञ पाकिस्तानातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यात होणा-या पाण्याच्या तुटवड्यावर लक्ष वेधत आले आहेत. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांमधून मिळणा-या हिश्श्याच्या पाण्याकडे पाकिस्तान लक्ष्य देत नाही आहे. तर पाण्याच्या साठवणुकीसंदर्भात पाकिस्तान बेफिकीर आहे.1990नंतर पाकिस्ताननं पाण्यासंदर्भात कोणतीही योजना आखलेली नाही. तसेच येत्या काळातील पाण्याच्या संकटाकडेही पाकिस्ताननं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तर पाकिस्तानचे स्थानिक वृत्त एक्स्प्रेस लिहितो, जगभरातल्या अनेक भागात पाण्याचा तुटवडा आहे आणि जिकडे पाणी आहे तेसुद्धा प्रदूषित आहे. पाकिस्तानातलं 80 टक्के पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते. त्यातच भारतानं सिंधू पाणी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या अ‍ॅटर्नी जनरल(एजीपी)च्या नेतृत्वातील चार सदस्यांच्या एका प्रतिनिधीमंडळ वॉशिंग्टनला पोहोचले होते. हे प्रतिनिधीमंडळानं किशनगंगा परियोजना आणि दोन्ही देशांमधल्या पाणीकरारावरून जागतिक बँकेशी बैठकही केली होती. तर गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला होता. या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेत धाव घेतली होती. मात्र जागतिक बँकेने या प्रकरणी भारताचा प्रस्ताव स्वीकार करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला होता.पाकिस्तानने किशनगंगा प्रकल्पाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा, असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWaterपाणीWorld Bankवर्ल्ड बँक