शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 09:55 IST

पुढच्या महिन्यांत म्हणजेच जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे.

नवी दिल्ली - देशावर एकीकडे कोरोनाचं मोठं संकट असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलं. पाकिस्तानमधून आलेले टोळ कीटक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली आहे. वाळवंटी टोळांनी राज्यातील 20 जिल्ह्यांतील 90 हजार हेक्टरवरील पिके फस्त केली. मध्यप्रदेश आणि राजस्थानातही टोळधाडीचा धुमाकूळ सुरू असून, हरयाणात हायअलर्ट जारी करण्यात आला. ही 26 वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा देशात टोळधाड धडकणार असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. 

पुढच्या महिन्यांत म्हणजेच जुलैमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे. त्यानंतर केंद्राने राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. FAO ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाले आणि 1962नंतर प्रथमच टोळधाडाचं संटक आलं. राजस्थानच्या वाळवंटात पावसाळा सुरू होताच प्रजननासाठी टोळधाड पूर्वे व पश्चिमेकडे फिरतील. त्यामुळे जूनमध्ये ते दक्षिण इराण आणि जुलैमध्ये हॉर्न ऑफ आफ्रिका द्वीपकल्पात असतील. 

तज्ज्ञांच्या मते पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेती खराब करणारे टोळधाड एप्रिलमध्ये पाकिस्तानातून भारतात आले. उत्तर-पूर्व सोमालियाला पोहोचणारे टोळधाड उत्तर हिंद महासागरातील भारत-पाकिस्तान सीमा भागात प्रवेश करणार आहे. सोमालिया आणि इथिओपियामध्येही अशीच परिस्थिती आहे. जूनच्या मध्यानंतर हे टोळधाड केनिया ते इथिओपिया आणि उत्तर सुदानपासून दक्षिण सुदानकडे जातील. मुख्य म्हणजे हे टोळ एका दिवसात 150 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतात आणि चौरस किलोमीटर असलेले ते जास्तीत जास्त 35,000 लोकांऐवढं खाऊ शकतात.

राजस्थान सरकारच्या टोळधाड चेतावणी संस्थेचे अधिकारी केएल गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बाडमेर आणि जोधपूर जिल्ह्यातील अनेक गावात टोळधाडचा हल्ला सुरू आहे. 65 हजार हेक्टर क्षेत्रावर टोळांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात टोळधाड दिसले नाही आहेत. एका हिंदी वेबबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत.

मध्यप्रदेशातील मालवा भागात टोळधाड आल्या आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यातील शेतकऱ्यांना टोळधाडीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या राज्यांमध्ये टोळ नियंत्रण अभियान सुरु करण्यात येत आहे.राजस्थानातील बारमेर, जोधपूर, नागौर, गंगानगर, हनुमानगड, जयपूर जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशातील सतना, ग्वाल्हेर, राजगड, बैतुल, देवास, आगर मालवा जिल्ह्यात टोळ सक्रीय आहेत. महाराष्ट्रात काही भागात किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : खरंच की काय? लॉकडाऊनमध्ये वाया गेलेली वाईन वाचवणार आता लोकांचा जीव; पण कसा...

CoronaVirus News : कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! ...म्हणून सिंगापूरमध्ये शेफ असलेल्या तरुणाला चाराव्या लागताहेत बकऱ्या

CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरी