शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, पोलिसांचा लाठीमार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 16:37 IST

बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलांच्या वसतीगृहांमधून पोलिस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बाँम्ब फेकण्यात आले.

वाराणसी, दि. 24 - बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलींच्या वसतिगृहांमधून पोलीस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. व्हीसी लॉजजवळ पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे वृत्त आल्यानंतर हा हिंसाचार भडकला. हे विद्यार्थी छेडछाडीच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींचे समर्थन करत आहेत.  रात्री 12 वाजल्यानंतर बीएचयूच्या वसतिगृहांमधून पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. या हिंसक घटनांमुळे विद्यापीठ 2 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास  कुलगुरू जी.सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थांवर सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक सुरक्षारक्षही जखमी झाले. तसेच बीएचयूच्या वसतीगृहांमधून पोलीस आणि सुरक्षारक्षकांवर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. 

संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सर सुंदरलाल रुग्णालयात घुसून दगडफेक केली. त्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण  निर्माण झाले. तसेच रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागला. हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 23 ठाण्यांच्या पथकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या 18 फैरी झाडल्या.  

दरम्यान कुलगुरूंनी या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आङे. याआधी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला आग लावली होती. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनी सुरक्षेच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरल्या आहेत. वाराणसीचे एसएसपी आर.के. भारद्वाज यांनी सांगितले की, "बीएचयूमझ्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच एसपी (शहर) दिनेश सिंह घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश