शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली हिंसा बास्स झाली - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 12:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली कुठल्याही प्रकारची हिंसा ही थांबलीच पाहिजे, लोकांना आपल्या हातात कायदा घेता येणार नाही अशा शब्दांमध्ये आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हिंसक गोरक्षकांना फटकारले आहे

ठळक मुद्देलोकांना कायदा हातात घेता येणार नाही आणि हे प्रकार थांबलेच पाहिजेतहे राज्यांच्या अधिकारातले विषय असून त्या त्या राज्य सरकारांनी कारवाई करायला हवी

नवी दिल्ली, दि. 6 - गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली कुठल्याही प्रकारची हिंसा ही थांबलीच पाहिजे, लोकांना आपल्या हातात कायदा घेता येणार नाही अशा शब्दांमध्ये आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हिंसक गोरक्षकांना फटकारले आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी याचिका तुषार गांधी व तेहसीन पूनावाला यांनी केली असून त्यांची बाजू इंदिरा जयसिंग यांनी कोर्टात मांडली. त्यानंतर आपले निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश दीपक मिस्रा म्हणाले की, "केंद्र सरकार म्हणतं यासाठी कायदा केलेला आहे. लोकांना कायदा हातात घेता येणार नाही आणि हे प्रकार थांबलेच पाहिजेत. असं गोरक्षण सुरू ठेवता येणार नाही."

केंद्र सरकार गोरक्षकांच्या कारवायांना पाठिंबा देत नसल्याचं सांगत असलं तरी गोरक्षकांचा उच्छाद सुरू असल्याकडे जयसिंग यांनी लक्ष वेधलं. गुन्हे दाखल झाले असल्याचंही जयसिंग म्हणाल्या. परंतु, लोकांची हत्या झाल्यावर कोर्टापुढे येण्यापेक्षा अशा हत्या होताच कामा नाहीत यासाठी उपाय करायला हवेत अशी बाजू त्यांनी मांडली आहे.

21 जुलै रोजी मोदी सरकारच्या वतीने गोरक्षकांच्या कारवायांना सरकार पाठिंबा देत नसल्याचं कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या अर्थाचं प्रतिज्ञापत्रही लिहून देण्याची तयारी सरकारच्या वतीने महाधिवक्ता रणजीत कुमार यांनी दर्शवली. तसेच, या प्रकारचे गुन्हे व त्यांच्यावरील कारवाई हे राज्यांच्या अधिकारातले विषय असून त्या त्या राज्य सरकारांनी कारवाई करायला हवी अशी भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यांनी कारवाई सुरू केली असून आरोपी पकडण्यात आल्याचंही सराकरच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड व कर्नाटक या राज्यांनी गोरक्षकांच्या संस्थांना अधिकृत परवाने दिले असून या राज्यांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली हत्या ल हल्ले करण्याचे काही प्रकार घडले आहेत. केंद्र सरकार व या राज्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नोटीस बजावली व या प्रकरणी आपली बाजू मांडण्यास सांगितले. अर्थात, कुठल्याही प्रकारे गोरक्षणाच्या नावाखाली होणार हिंसाचार मान्य होणारा नाही हे न्यायालयाने अधोरेखीत केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrimeगुन्हाBJPभाजपाPoliceपोलिस