शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली हिंसा बास्स झाली - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 12:24 IST

गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली कुठल्याही प्रकारची हिंसा ही थांबलीच पाहिजे, लोकांना आपल्या हातात कायदा घेता येणार नाही अशा शब्दांमध्ये आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हिंसक गोरक्षकांना फटकारले आहे

ठळक मुद्देलोकांना कायदा हातात घेता येणार नाही आणि हे प्रकार थांबलेच पाहिजेतहे राज्यांच्या अधिकारातले विषय असून त्या त्या राज्य सरकारांनी कारवाई करायला हवी

नवी दिल्ली, दि. 6 - गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली कुठल्याही प्रकारची हिंसा ही थांबलीच पाहिजे, लोकांना आपल्या हातात कायदा घेता येणार नाही अशा शब्दांमध्ये आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हिंसक गोरक्षकांना फटकारले आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी याचिका तुषार गांधी व तेहसीन पूनावाला यांनी केली असून त्यांची बाजू इंदिरा जयसिंग यांनी कोर्टात मांडली. त्यानंतर आपले निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश दीपक मिस्रा म्हणाले की, "केंद्र सरकार म्हणतं यासाठी कायदा केलेला आहे. लोकांना कायदा हातात घेता येणार नाही आणि हे प्रकार थांबलेच पाहिजेत. असं गोरक्षण सुरू ठेवता येणार नाही."

केंद्र सरकार गोरक्षकांच्या कारवायांना पाठिंबा देत नसल्याचं सांगत असलं तरी गोरक्षकांचा उच्छाद सुरू असल्याकडे जयसिंग यांनी लक्ष वेधलं. गुन्हे दाखल झाले असल्याचंही जयसिंग म्हणाल्या. परंतु, लोकांची हत्या झाल्यावर कोर्टापुढे येण्यापेक्षा अशा हत्या होताच कामा नाहीत यासाठी उपाय करायला हवेत अशी बाजू त्यांनी मांडली आहे.

21 जुलै रोजी मोदी सरकारच्या वतीने गोरक्षकांच्या कारवायांना सरकार पाठिंबा देत नसल्याचं कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या अर्थाचं प्रतिज्ञापत्रही लिहून देण्याची तयारी सरकारच्या वतीने महाधिवक्ता रणजीत कुमार यांनी दर्शवली. तसेच, या प्रकारचे गुन्हे व त्यांच्यावरील कारवाई हे राज्यांच्या अधिकारातले विषय असून त्या त्या राज्य सरकारांनी कारवाई करायला हवी अशी भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यांनी कारवाई सुरू केली असून आरोपी पकडण्यात आल्याचंही सराकरच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड व कर्नाटक या राज्यांनी गोरक्षकांच्या संस्थांना अधिकृत परवाने दिले असून या राज्यांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली हत्या ल हल्ले करण्याचे काही प्रकार घडले आहेत. केंद्र सरकार व या राज्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नोटीस बजावली व या प्रकरणी आपली बाजू मांडण्यास सांगितले. अर्थात, कुठल्याही प्रकारे गोरक्षणाच्या नावाखाली होणार हिंसाचार मान्य होणारा नाही हे न्यायालयाने अधोरेखीत केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrimeगुन्हाBJPभाजपाPoliceपोलिस