शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत'

By महेश गलांडे | Published: January 26, 2021 3:05 PM

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.

नवी दिल्ली - राजधानीतील दिल्लीत आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. परंतु, या रॅलीला आता हिंसक वळण लागले आहे. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमधील संघर्ष वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांवर दगडफेक आणि ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बचावात्मक पवित्रा पत्करत पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराचे नळकांडी फोडली. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आपला मोर्चा वळवळा असून लाल किल्ल्यावरच किसान आंदोलनाच ध्वज फडकवला आहे. त्यामुळे, आंदोलनाल हिंसक वळण लागलंय. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु शेतकऱ्यांना हिंसक न होण्याचं आवाहन केलंय. तसेच, मोदी सरकारने त्वरीत हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असेही सूचवले आहे. राहुल यांनी ट्विट केले आहे की, हिंसा हे कुठल्याच समस्येचं समाधान नाही. इजा कोणालाही होऊ द्या, नुकसान आपल्याच देशाचं होणार आहे. देशाच्या हितासाठी कृषी विरोधी कायदे माघारी घ्या, असे राहुल यांनी आपल्या टिवटर अकाऊंटवरुन म्हटलंय. 

गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन (परेड) पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. 

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला होता. मात्र, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर आणि तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार होते. पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीमार केला असून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळेच, शेतकरी आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे अतिशय संयमी आणि अहिंसक आंदोलन होते. मात्र, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्यानं दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीdelhiदिल्लीRepublic Dayप्रजासत्ताक दिनFarmer strikeशेतकरी संप