शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कथित अफेअरने शहरात लावली आग; लव्ह जिहादच्या आरोपावरून मध्य प्रदेशात हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:15 IST

मध्य प्रदेशात कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठा हिंसाचार उफाळून आला आहे.

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात एका कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात मध्य प्रदेशातील एक मुलगी घरातून पळून गेल्याने कथित लव्ह जिहादच्या संशयावरुन एका समुदायाचे लोक दुसऱ्या समुदायाच्या लोकांशी भिडले. काही वेळातच वादाने हिंसक रुप घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गावात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. जमावाने काही घरे आणि दुकानेही पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सागर जिल्ह्यातील सनोधा भागात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हिंसाचार उसळला. यावेळी दुकाने आणि घरे पेटवून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "आम्हाला सनोधा गावात काही घटनांबद्दल माहिती मिळाली. प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे आणि परिस्थिती शांत आहे. पोलीस दल तैनात आहे, तपास सुरू आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिकता आहे," अशी माहिती सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप जीआर यांनी दिली. 

एका समुदायाच्या तरुणाने हिंदू मुलीचे अपहरण केल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. सनोधा शहरात राहणारी मुलगी कालपासून बेपत्ता आहे. त्याच शहरातील तरुणही कालपासून बेपत्ता आहे. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की त्याच तरुणाने मुलीला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबासह शहरातील लोक रस्त्यावर उतरले. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ देखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सनोधा गावातील त्या मुलीचे लग्न होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी एका मुलाने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केली. ही माहिती पसरताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मुलीचे नातेवाईक आणि समाजातील लोक गावात जमले आणि त्यांनी या विरोधात निषेध करण्यास सुरुवात केली. बिघडलेली परिस्थिती पाहून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोकांनी मुलीला शोधून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.

मुलीसोबत पळून गेलेल्या मुलाच्या गावात असलेल्या दुकानांना आणि घरांना काही लोकांनी आग लावली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. संपूर्ण गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. संतप्त लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस