शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कथित अफेअरने शहरात लावली आग; लव्ह जिहादच्या आरोपावरून मध्य प्रदेशात हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:15 IST

मध्य प्रदेशात कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठा हिंसाचार उफाळून आला आहे.

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात एका कथित लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात मध्य प्रदेशातील एक मुलगी घरातून पळून गेल्याने कथित लव्ह जिहादच्या संशयावरुन एका समुदायाचे लोक दुसऱ्या समुदायाच्या लोकांशी भिडले. काही वेळातच वादाने हिंसक रुप घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गावात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. जमावाने काही घरे आणि दुकानेही पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सागर जिल्ह्यातील सनोधा भागात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हिंसाचार उसळला. यावेळी दुकाने आणि घरे पेटवून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "आम्हाला सनोधा गावात काही घटनांबद्दल माहिती मिळाली. प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे आणि परिस्थिती शांत आहे. पोलीस दल तैनात आहे, तपास सुरू आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची प्राथमिकता आहे," अशी माहिती सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप जीआर यांनी दिली. 

एका समुदायाच्या तरुणाने हिंदू मुलीचे अपहरण केल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. सनोधा शहरात राहणारी मुलगी कालपासून बेपत्ता आहे. त्याच शहरातील तरुणही कालपासून बेपत्ता आहे. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की त्याच तरुणाने मुलीला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबासह शहरातील लोक रस्त्यावर उतरले. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ देखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सनोधा गावातील त्या मुलीचे लग्न होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी एका मुलाने मुलीचे अपहरण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केली. ही माहिती पसरताच शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मुलीचे नातेवाईक आणि समाजातील लोक गावात जमले आणि त्यांनी या विरोधात निषेध करण्यास सुरुवात केली. बिघडलेली परिस्थिती पाहून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोकांनी मुलीला शोधून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.

मुलीसोबत पळून गेलेल्या मुलाच्या गावात असलेल्या दुकानांना आणि घरांना काही लोकांनी आग लावली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. संपूर्ण गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. संतप्त लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस