शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 18:46 IST

देवेंद्र मिश्रा यांच्यासारख्या प्रामाणिक डीएसपी आणि त्यांच्यासोबतच्या 8 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबे या राक्षसाचा खात्मा केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन - उमा भारती

ठळक मुद्देविकास दुबे एन्काऊंटरनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकास दुबे एन्काऊंटरवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : गँगस्टर विकास दुबेचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या एन्काऊंटरमध्ये विकास दुबे ठार झाला. या एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

याप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना काही प्रश्न विचारले आहेत. याप्रकरणी उमा भारती यांनी ट्विटद्नारे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवेंद्र मिश्रा यांच्यासारख्या प्रामाणिक डीएसपी आणि त्यांच्यासोबतच्या 8 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबे या राक्षसाचा खात्मा केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गोळ्या घालण्यात आल्या, असे उमा भारती म्हणाल्या.

याचबरोबर, उमा भारती यांनी तीन गोष्टी रहस्यमय आहेत असे सांगत प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये (१) तो उज्जैनला कसा पोहोचला? (२) तो महाकाल कॉम्प्लेक्समध्ये किती काळ राहिला? (३) त्याचा चेहरा टीव्हीवर इतका दिसून आला की कोणीही त्याला ओळखू शकले असते, मग त्याला ओळखण्यात एवढा वेळ कसा लागला?, असे उमा भारती यांनी प्रश्न विचारले आहेत. 

दुसर्‍या ट्विटमध्ये उमा भारती यांनी म्हटले आहे की, 'मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याशी नक्कीच या विषयावर चर्चा करणार आहे. परंतु सत्य समोर आले आहे की भगवान महाकालने देवेंद्र मिश्रासारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या मारेकऱ्याला ठार केले." 

विकास दुबे एन्काऊंटरनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?" असे प्रियंका यांनी म्हटले आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकास दुबे एन्काऊंटरवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

आणखी बातम्या...

'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला

मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीVikas Dubeyविकास दुबे