शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 18:46 IST

देवेंद्र मिश्रा यांच्यासारख्या प्रामाणिक डीएसपी आणि त्यांच्यासोबतच्या 8 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबे या राक्षसाचा खात्मा केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन - उमा भारती

ठळक मुद्देविकास दुबे एन्काऊंटरनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकास दुबे एन्काऊंटरवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : गँगस्टर विकास दुबेचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या एन्काऊंटरमध्ये विकास दुबे ठार झाला. या एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

याप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना काही प्रश्न विचारले आहेत. याप्रकरणी उमा भारती यांनी ट्विटद्नारे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवेंद्र मिश्रा यांच्यासारख्या प्रामाणिक डीएसपी आणि त्यांच्यासोबतच्या 8 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबे या राक्षसाचा खात्मा केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गोळ्या घालण्यात आल्या, असे उमा भारती म्हणाल्या.

याचबरोबर, उमा भारती यांनी तीन गोष्टी रहस्यमय आहेत असे सांगत प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये (१) तो उज्जैनला कसा पोहोचला? (२) तो महाकाल कॉम्प्लेक्समध्ये किती काळ राहिला? (३) त्याचा चेहरा टीव्हीवर इतका दिसून आला की कोणीही त्याला ओळखू शकले असते, मग त्याला ओळखण्यात एवढा वेळ कसा लागला?, असे उमा भारती यांनी प्रश्न विचारले आहेत. 

दुसर्‍या ट्विटमध्ये उमा भारती यांनी म्हटले आहे की, 'मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याशी नक्कीच या विषयावर चर्चा करणार आहे. परंतु सत्य समोर आले आहे की भगवान महाकालने देवेंद्र मिश्रासारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या मारेकऱ्याला ठार केले." 

विकास दुबे एन्काऊंटरनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?" असे प्रियंका यांनी म्हटले आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकास दुबे एन्काऊंटरवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

आणखी बातम्या...

'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला

मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीVikas Dubeyविकास दुबे