शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

Video - सरकारी अर्जासाठी रांगेत उभ्या होत्या महिला, राहुल गांधींना पाहताच भेटायला धावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 17:42 IST

Rahul Gandhi : शेकडो महिला नव्याने जाहीर झालेल्या सरकारी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी जमल्या होत्या. याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील तिथे आले. त्यावेळी राहुल गांधींना पाहताच सर्व महिला त्याचं स्वागत करण्यासाठी रांग सोडून धावत निघून गेल्या.

आसामच्या जोरहाटमध्ये गुरुवारी शेकडो महिला नव्याने जाहीर झालेल्या सरकारी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी जमल्या होत्या. याच वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील तिथे आले. त्यावेळी राहुल गांधींना पाहताच सर्व महिला त्यांचं स्वागत करण्यासाठी रांग सोडून धावत निघून गेल्या. सध्या राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेचं नेतृत्व करत आहेत.

गुरुवारी दुपारी काँग्रेसचे नेते शिवसागर येथून मरियानी शहरात पोहोचले. नाकाचारी परिसरातील शासकीय केंद्राबाहेर ग्रामीण महिला रांगेत उभ्या असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर राहुल गांधींचा ताफा पाहताच महिला रांग सोडून रस्त्याकडे धावल्या. ताफा थांबताच राहुल त्यांच्या बसमधून बाहेर आले.

अनेक महिलांनी राहुल गांधी यांच्या पायाला स्पर्श केला. यावेळी राहुल यांनी महिलांना असं करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. महिलांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी महिलांशी संवाद साधला आणि नंतर बोलता बोलता ते पुढे निघून गेले.

राहुल गांधींसोबत या यात्रेत काँग्रेसचे नेते जयराम रमेश हे देखील होते. ट्विटरवर त्यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. "भारत जोडो न्याय यात्रेच्या पाचव्या दिवशी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मारियानी येथे आलेल्या महिला स्वतःहून मोठ्या उत्साहात राहुल गांधींची भेट घेण्यासाठी आल्या. आसामसाठी न्यायाची सुरुवात झाली आहे."

राहुल गांधी यांनी 14 जानेवारी रोजी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली होती. ही यात्रा 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. या कालावधीत 67 दिवसांत 15 राज्यांतील 110 जिल्हे कव्हर केले जाणार आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAssamआसाम