शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Video : तुमचं नाव लिहून आत्महत्या करू, पूरग्रस्त पीडित महिलेची आमदाराला धमकी

By महेश गलांडे | Published: October 16, 2020 10:23 AM

महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे.

ठळक मुद्देउप्पल मतदारसंघात आमदार सुभाष रेड्डी हे नावेत बसून पूरग्रस्त भागांची पाहणी करत होते. त्यावेळी, रविंद्र नगर कॉलनीत 3 दिवसांपासून पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा रोष बाहेर पडला.

हैदराबाद - तेलंगणातही परतीच्या पावसाने हाहाकार माजला असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे काही भागांत गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचा राग अनावर होत आहे. राज्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाआहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केली आहे. तर, दुसरीकडे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपल्या भागात पाहणीसाठी आलेल्या आमदारास स्थानिक महिलांनी चांगलंच सुनावलं. 

महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेलंगणा राज्यातही तशीच परिस्थिती दिसत आहे. हैदराबादमध्ये पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हैदराबादसह आजुबाजूचे काही जिल्हे पूराच्या पाण्याने प्रभावित झाले असून 101 तलाव भरुन वाहत आहेत. तर, राज्यातील 7.3 लाख एकर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. 

हैदराबादमधील लोकांच्या घरा-घरात पाणी शिरले असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निर्सग शक्तीपुढे प्रशासन हतबल झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी पूरग्रस्त भागांची पाहणी करताना दिसत आहेत. हैदराबादच्या उप्पल मतदारसंघातील आमदार सुभाष रेड्डी हे स्थानिक भागात पाहणीसाठी गेले असताना महिलांना त्यांना चांगलेच सुनावले. त्यावेळी, आमदार व महिलांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पीडित महिलांनी तुमचे नाव लिहून आत्महत्या करू, असा इशाराच आमदार महोदयांना दिला. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी यासंदर्भातील व्हिडिओचे ट्विट शेअर केले आहे. 

उप्पल मतदारसंघात आमदार सुभाष रेड्डी हे नावेत बसून पूरग्रस्त भागांची पाहणी करत होते. त्यावेळी, रविंद्र नगर कॉलनीत 3 दिवसांपासून पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा रोष बाहेर पडला. विशेष म्हणजे 3 दिवसांपासून या भागात वीजही नव्हती. त्यामुळे, महिलांनी आमदार महोदयांना खडे बोल सुनावले. तसेच, तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकीही दिली. 

टॅग्स :floodपूरRainपाऊसMLAआमदारhyderabad-pcहैदराबादTelanganaतेलंगणा