शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 10:14 PM

मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीवरुन भाजपाने काँग्रेसवर टीका केली होती. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यानंतर, आता भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणींनीही कर्जमाफीवरुन मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित नागरिकांनी उलट उत्तर देत स्मृती इराणींनाच गोंधळात टाकलं. 

मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे. तर, काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपाला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. येथील काँग्रेस नेत्यांनी अनोखी शक्कल लढवत थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे घर गाठले होते. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये शिष्टमंडळाने कर्जमाफी केल्याचे पुरावे म्हणून दस्तावेज दिले. तब्बल एक गाडी भरुन हे दस्तावेज शिवराज चौहान यांच्या घरी आणून त्यांच्यासमोर ही सगळी कागदपत्रे ठेवली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क आयड्रॉप्स, बदाम आणि चव्यनप्राश पाठवून शिवराज सिंह चौहान यांनी खिल्ली उडवली. तर, आता स्मृती इराणींच्या सभेत काही कार्यकर्त्यांनी गोंधळा घातला आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचे शेवटचे दोन टप्पे बाकी असून प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मध्य प्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी अशोक नगर येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी, एका सभेला संबोधित करताना काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचं त्यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकांवेळी काँग्रेसने 10 दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. मला सांगा, कर्ज माफ झालंय? असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला. त्यावेळी, या सभेला ऐकणाऱ्या काही नागरिकांनी हो झाली.. हो झाली... म्हणत स्मृती इराणींची गोची करुन ठेवली. तर, त्यावेळी तिथे उपस्थितांपैकी काहींनी यास प्रतिउत्तर देण्यासाठी मोदी मोदीच्या घोषणाही दिल्या. मात्र, कर्जमाफी झाली का, या प्रश्नावर होय.. होय.. झाली असे उत्तर मिळाल्याने काही वेळी स्मृती इराणीही गोंधळात पडल्याचे दिसून आले.

 

दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसने याबाबतचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, आता जनताच यांच्या खोटारडेपणाला उत्तर देईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक