शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"प्रत्येक भारतीयाच्या खात्यातून सवा रुपया घ्या; शहिदांच्या कुटुंबाला मदत देणं हे सगळ्यांचं कर्तव्य!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:32 IST

India China StandOff: जवान हे देशवासीयांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत असतात. त्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबाला केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत योगदान देणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्यच आहे.

ठळक मुद्देदेशाच्या सीमांवर लढताना अनेक जवानांना हौतात्म्य येतं. ते सगळ्यांनाच चटका लावून जातं.शहीद जवानांच्या कुटुंबाला थोडा आधार, या भावनेतून त्यांना आर्थिक मदत केली जाते.शहीद जवानांच्या कुटुंबाला केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत योगदान देणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्य आहे.

भारत-चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारतमातेच्या २० सुपुत्रांना वीरमरण आलं आहे. त्यांचं बलिदान कायम स्मरणात राहील, अशी भावना देशवासीय व्यक्त करत आहेत. देशाच्या सीमांवर लढताना अनेक जवानांना हौतात्म्य येतं. ते सगळ्यांनाच चटका लावून जातं. या शहिदांच्या कुटुंबीयांचा विचार मनात येतोच येतो. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून, तसंच काही दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत केली जाते. खरं तर, जवानांच्या हौतात्म्याचं मोल पैशांमध्ये होऊच शकत नाही. परंतु, कुटुंबाला थोडा आधार, या भावनेतून ही रक्कम दिली जाते.

जवान हे देशवासीयांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत असतात. त्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबाला केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत योगदान देणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्यच आहे. याच विचारातून विश्व हिंदू परिषदेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कल्पना सुचवली आहे.

जेव्हा भारतीय लष्कराच्या जवानाला वीरमरण येतं, तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यातून सवा रुपया घेऊन ती रक्कम शहीद जवानाच्या खात्यात जमा करावी, असं पत्र विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी पंतप्रधानांना लिहिलं आहे. या योगदानाच्या माध्यमातून, देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानाला प्रत्येक भारतीय नागरिक खरी श्रद्धांजली वाहू शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या सूचनेवर विचार करावा आणि या मदतनिधीसाठी परिपूर्ण कार्यप्रणाली तयार करून बँकांना योग्य निर्देश द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

शहीद जवानांच्या कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी

लडाखच्या गलवान खोऱ्यात बिहारमधील पाच जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला बिहार सरकारद्वारे नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या त्या विधानामुळे माजी सैनिक संतप्त, तीव्र शब्दांत व्यक्त केली नाराजी

भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी