शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Uttarakhand: उत्तराखंडमधील चार धाम यात्रेत आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू, समोर आले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:30 AM

यंदा उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू होऊन केवळ 13 दिवस झाले आहेत.

डेहराडून:उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या महासंचालक डॉ. शैलजा भट्ट यांनी सांगितले की, या सर्व मृत्यूंची कारणे उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या समस्या आणि माउंटन सिकनेस (उंचीशी संबंधित समस्या) आहेत. यंदा उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू होऊन केवळ 13 दिवस झाले आहेत, अशा स्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य सेवेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या सणापासून सुरू झालेल्या चार धाम यात्रेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांच्या या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि मंदिरांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक धाममध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक हजाराने वाढवली. 

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांमधील - 2700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या यात्रेकरूंना अत्यंत थंडी, कमी आर्द्रता, अतिनील किरणे, कमी हवेचा दाब यांचा सामना करावा लागतो. यासोबत ऑक्सिजनची कमतरताही भासते. या सर्व गोष्टीमुळे वैद्यकीय तपासणीनंतरच प्रवास सुरू करावा, असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.

याशिवाय आधीच आजारी असलेल्यांना डॉक्टरांचा अहवाल, त्यांची औषधे आणि डॉक्टरांचा फोन नंबर सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच हृदयविकार, श्‍वसनाचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा रुग्णांनी उंच भागात जाताना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार डोकेदुखी, चक्कर येणे, घबराट होणे, हृदयाचे ठोके जलद होणे, उलट्या होणे, हातपाय आणि ओठ निळे पडणे, थकवा येणे, धाप लागणे, खोकला किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करण्यास सांगितले आहे. यासाठी सरकारने 104 हा हेल्पलाइन क्रमांक काढला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडDeathमृत्यू