शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:28 IST

Sky lightning death toll : उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानात (Rajasthan) वीज कोसळल्याने (Lightning) जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये सर्वाधिक 14 जणांचा वीज कोसळ्याने मृत्यू झाला. तसेच, कानपूर देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी 5 जणांचा, कौशांबी येथे 4 जणांचा, फिरोजाबादमध्ये 3 जणांचा, उन्नाव हमीरपूर सोनभद्रमध्ये प्रत्येकी 2 जणांचा आणि कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येकी एकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. याशिवाय, 22 जण जखमी झाले असून 200 हून अधिक गुरांचाही मृत्यू झाला आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ मदत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास हवामान खराब झाले होते. यामुळे अनेक ठिकाणी पावसासोबतच विजाही कोसळल्या.

तर, राजस्थानात वीज कोसळल्याने जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानात रविवारी वीज कोसळल्याने मरणारांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. यांत जयपूर मध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटामध्ये 4, झालावाडमध्ये 1 आणि बारांमध्ये एकाचा मृत्यू झाला.

राजस्थान सरकारकडून मृतांचा कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यांपैकी 4 लाख रुपये आपत्कालीन मदत निधीतून आणि 1 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांना श्रद्धांजली देत, त्यांच्या कुटुंबीयांना तत्काल मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेशRajasthanराजस्थानDeathमृत्यू