शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:28 IST

Sky lightning death toll : उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानात (Rajasthan) वीज कोसळल्याने (Lightning) जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये सर्वाधिक 14 जणांचा वीज कोसळ्याने मृत्यू झाला. तसेच, कानपूर देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी 5 जणांचा, कौशांबी येथे 4 जणांचा, फिरोजाबादमध्ये 3 जणांचा, उन्नाव हमीरपूर सोनभद्रमध्ये प्रत्येकी 2 जणांचा आणि कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येकी एकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. याशिवाय, 22 जण जखमी झाले असून 200 हून अधिक गुरांचाही मृत्यू झाला आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ मदत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास हवामान खराब झाले होते. यामुळे अनेक ठिकाणी पावसासोबतच विजाही कोसळल्या.

तर, राजस्थानात वीज कोसळल्याने जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानात रविवारी वीज कोसळल्याने मरणारांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. यांत जयपूर मध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटामध्ये 4, झालावाडमध्ये 1 आणि बारांमध्ये एकाचा मृत्यू झाला.

राजस्थान सरकारकडून मृतांचा कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यांपैकी 4 लाख रुपये आपत्कालीन मदत निधीतून आणि 1 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांना श्रद्धांजली देत, त्यांच्या कुटुंबीयांना तत्काल मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेशRajasthanराजस्थानDeathमृत्यू