शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:28 IST

Sky lightning death toll : उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानात (Rajasthan) वीज कोसळल्याने (Lightning) जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये सर्वाधिक 14 जणांचा वीज कोसळ्याने मृत्यू झाला. तसेच, कानपूर देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी 5 जणांचा, कौशांबी येथे 4 जणांचा, फिरोजाबादमध्ये 3 जणांचा, उन्नाव हमीरपूर सोनभद्रमध्ये प्रत्येकी 2 जणांचा आणि कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येकी एकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. याशिवाय, 22 जण जखमी झाले असून 200 हून अधिक गुरांचाही मृत्यू झाला आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ मदत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास हवामान खराब झाले होते. यामुळे अनेक ठिकाणी पावसासोबतच विजाही कोसळल्या.

तर, राजस्थानात वीज कोसळल्याने जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानात रविवारी वीज कोसळल्याने मरणारांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. यांत जयपूर मध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटामध्ये 4, झालावाडमध्ये 1 आणि बारांमध्ये एकाचा मृत्यू झाला.

राजस्थान सरकारकडून मृतांचा कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यांपैकी 4 लाख रुपये आपत्कालीन मदत निधीतून आणि 1 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांना श्रद्धांजली देत, त्यांच्या कुटुंबीयांना तत्काल मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेशRajasthanराजस्थानDeathमृत्यू