शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

हत्येच्या ७ वर्षानंतर महिला जिवंत परतली; तिच्या हत्येप्रकरणी २ जणांनी भोगली ३ वर्षांची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 15:59 IST

Woman returned alive after 7 years of murder: राजस्थानमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचे मोठे आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील दौसा येथून मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे एका महिलेने पोलिसांना देखील चकित केले. याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण हत्या झालेली महिला तब्बल ७ वर्षानंतर जिवंत सापडली आहे. एवढेच नाही तर या महिलेच्या हत्येप्रकरणी दोन जणांनी जवळपास अडीच ते तीन वर्षे तुरुंगावस देखील भोगला आहे. आता महिला आल्याने सापडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात व्यस्त आहेत. 

उत्तर प्रदेशातील कौशी येथे राहणारी आरती काही वर्षांपूर्वी दौसाच्या मेहदीपूर बालाजीमध्ये राहू लागली होती. इथे ती छोटीमोठी कामे करून उदरनिर्वाह करायची. इथेच तिची भेट सोनू सैनी नावाच्या व्यक्तीशी झाली. दोघांचा संपर्क वाढल्यावर त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले, मग ते एकत्र राहू लागले. लग्नानंतर काही दिवसांनी आरती बेपत्ता झाली होती. आरती बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी वृंदावन येथील कालव्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता.

कपड्यांच्या आधारे वडिलांनी ओळखीचा केला दावासंबंधित मृतदेहाची ओळख पटली नाही तरीदेखील पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर आरतीचे वडील त्या पोलीस ठाण्यात गेले आणि फोटो आणि कपड्याच्या आधारे ती आपली मुलगी आरती असल्याचा दावा केला. त्यानंतर आरतीच्या वडिलांनी २०१५ मध्ये वृंदावन येथील सोनू सैनी आणि दौसा येथील गोपाल सैनी यांच्या विरोधात तिच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता. 

पोलिसांनी राजस्थानमध्ये येऊन दोघांना केली अटक याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलिसांनी दौसा येथे जाऊन आरतीच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले. ते ओरडत राहिले पण पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. नंतर सोनू सैनी आणि गोपाल सैनी सुमारे अडीच ते तीन वर्षे तुरुंगात राहिले आणि नंतर जामिनावर बाहेर आले. जामिनावर बाहेर आल्यानंतर पीडित व्यक्तींनी तपास केला असता दौसा येथील विशाला गावात आरती ही महिला जिवंत आढळून आली.

आरतीला पोलिसांना घेतलं ताब्यात यावर पीडितांनी मेहंदीपूर बालाजी स्टेशन हाऊस ऑफिसर अजित बडसारा यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. पीडितांची कहाणी ऐकल्यानंतर मेहंदीपूर बालाजी पोलिसांनी बैजूपाडा परिसरातून आरती या महिलेला अटक केली आहे. त्यानंतर मेहंदीपूर बालाजी पोलीस ठाण्याने उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलिसांना दौसा येथे बोलावले. दौसा पोलिसांनी आरतीला वृंदावन पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्षणीय बाब म्हणजे तपासात असे समोर आले की, याआधी सोनू सैनीसोबत आरतीने लग्न केले होते, नंतर तिचे लग्न भगवान सिंग रेबारीसोबत झाले.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी