शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:41 IST

Vikas Dubey: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोणताही पुरावा सापडला नाहीनिवृत्त न्या. बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीचा अहवालउत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने उत्तर प्रदेशपोलिसांना क्लीन चिट दिली आहे. विकास दुबेचे बदला घेण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले होते, असा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर करण्यात आला होता. आता मात्र क्लीन चिट मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. (uttar pradesh police gets clean chit in vikas dubey encounter case) 

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांवर ठपका ठेवण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. आठ महिने तपास केल्यानंतर या तपास समितीने आपला अहवाल दिला आहे.  विकास दुबेने आठ पोलिसांना ठार केल्यानंतर बदला घेताना पोलिसांनी विकास दुबेला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप होता. 

तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

कोणताही पुरावा सापडला नाही

आठ महिने तपास केल्यानंतर न्या. बी. एस. चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांची बाजू खोटी ठरवणारा एकही साक्षीदार सापडला नसल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्यात पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते. यावेळी त्यांनी विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने ठार केल्याचे सांगण्यात आले होते.

“हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

'असा' होता घटनाक्रम

गतवर्षीच्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस आणि गुडांमध्ये चकमक झाली होती. यावेळी विकास दुबेच्या सहकाऱ्यांनी आठ पोलीस कर्मचाऱ्यांना ठार केले होते. पोलीस बिकरु गावात पोहोचले असता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. यानंतर एका आठवड्याने मध्य प्रदेशात विकास दुबेला अटक करून गाडीने उत्तर प्रदेशात आणले जात होते. यावेळी महामार्गावर पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आणि गाडी उलटली. याचा फायदा घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. विरोधकांनी योगी सरकारवर मोठे आरोप केले होते. पोलिसांनी बदला घेण्यासाठी हा एन्काऊंटर घडवून आणल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली. 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथ