शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:41 IST

Vikas Dubey: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोणताही पुरावा सापडला नाहीनिवृत्त न्या. बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीचा अहवालउत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने उत्तर प्रदेशपोलिसांना क्लीन चिट दिली आहे. विकास दुबेचे बदला घेण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले होते, असा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर करण्यात आला होता. आता मात्र क्लीन चिट मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. (uttar pradesh police gets clean chit in vikas dubey encounter case) 

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांवर ठपका ठेवण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. आठ महिने तपास केल्यानंतर या तपास समितीने आपला अहवाल दिला आहे.  विकास दुबेने आठ पोलिसांना ठार केल्यानंतर बदला घेताना पोलिसांनी विकास दुबेला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप होता. 

तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

कोणताही पुरावा सापडला नाही

आठ महिने तपास केल्यानंतर न्या. बी. एस. चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांची बाजू खोटी ठरवणारा एकही साक्षीदार सापडला नसल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्यात पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते. यावेळी त्यांनी विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने ठार केल्याचे सांगण्यात आले होते.

“हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

'असा' होता घटनाक्रम

गतवर्षीच्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस आणि गुडांमध्ये चकमक झाली होती. यावेळी विकास दुबेच्या सहकाऱ्यांनी आठ पोलीस कर्मचाऱ्यांना ठार केले होते. पोलीस बिकरु गावात पोहोचले असता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. यानंतर एका आठवड्याने मध्य प्रदेशात विकास दुबेला अटक करून गाडीने उत्तर प्रदेशात आणले जात होते. यावेळी महामार्गावर पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आणि गाडी उलटली. याचा फायदा घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. विरोधकांनी योगी सरकारवर मोठे आरोप केले होते. पोलिसांनी बदला घेण्यासाठी हा एन्काऊंटर घडवून आणल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली. 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथ