शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:41 IST

Vikas Dubey: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोणताही पुरावा सापडला नाहीनिवृत्त न्या. बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीचा अहवालउत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने उत्तर प्रदेशपोलिसांना क्लीन चिट दिली आहे. विकास दुबेचे बदला घेण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले होते, असा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर करण्यात आला होता. आता मात्र क्लीन चिट मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा मिळाला आहे. (uttar pradesh police gets clean chit in vikas dubey encounter case) 

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांवर ठपका ठेवण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एस.चौहान यांच्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. आठ महिने तपास केल्यानंतर या तपास समितीने आपला अहवाल दिला आहे.  विकास दुबेने आठ पोलिसांना ठार केल्यानंतर बदला घेताना पोलिसांनी विकास दुबेला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप होता. 

तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

कोणताही पुरावा सापडला नाही

आठ महिने तपास केल्यानंतर न्या. बी. एस. चौहान समितीने उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांची बाजू खोटी ठरवणारा एकही साक्षीदार सापडला नसल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्यात पोलिसांनी विकास दुबेला ठार केले होते. यावेळी त्यांनी विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने ठार केल्याचे सांगण्यात आले होते.

“हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

'असा' होता घटनाक्रम

गतवर्षीच्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस आणि गुडांमध्ये चकमक झाली होती. यावेळी विकास दुबेच्या सहकाऱ्यांनी आठ पोलीस कर्मचाऱ्यांना ठार केले होते. पोलीस बिकरु गावात पोहोचले असता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. यानंतर एका आठवड्याने मध्य प्रदेशात विकास दुबेला अटक करून गाडीने उत्तर प्रदेशात आणले जात होते. यावेळी महामार्गावर पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आणि गाडी उलटली. याचा फायदा घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. विरोधकांनी योगी सरकारवर मोठे आरोप केले होते. पोलिसांनी बदला घेण्यासाठी हा एन्काऊंटर घडवून आणल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली. 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथ