शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

राम नाईक यांची 'काम की बात'; ४० वर्षांपासून सुरू आहे आदर्श परंपरा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 7:25 PM

१९७८ पासून सुरू असलेली एक परंपरा राम नाईक यांनी २०१९ पर्यंत अखंड सुरू ठेवलीय.

ठळक मुद्देराम नाईक दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल जनतेपुढे सादर करत आलेत. राज्यपाल म्हणून आपण वर्षभरात काय-काय कामं केली, याचा अहवाल त्यांनी सलग पाचव्या वर्षी प्रकाशित केला आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे गेली पाच वर्षं उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, भाजपाचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि मग राज्यपाल असा प्रवास त्यांनी केलाय. जवळपास ४०-४५ वर्षं ते सक्रिय राजकारणात आहेत. या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. जय-पराजय झाले. परंतु, १९७८ पासून सुरू असलेली एक परंपरा त्यांनी २०१९ पर्यंत अखंड सुरू ठेवलीय. राम नाईक दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल जनतेपुढे सादर करत आलेत. अगदी राज्यपाल म्हणून आपण वर्षभरात काय-काय कामं केली, याचा अहवाल त्यांनी सलग पाचव्या वर्षी प्रकाशित केला आहे. हा पायंडा सर्वच लोकप्रतिनिधींसाठी, राज्यपालांसाठी अनुकरणीय ठरणारा आहे. 

जनतेच्या समस्या समजाव्यात, त्यांच्याशी संपर्क राहावा म्हणून सुरुवातीच्या काळात अनेक वर्षं राम नाईक लोकल ट्रेनने प्रवास करत असत. मंत्री झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते शक्य नव्हतं. परंतु, आपल्या मतदारसंघासाठी आपण काय काम केलं, केंद्रीय मंत्री असताना महाराष्ट्रासाठी, देशासाठी काय निर्णय घेतले याची माहिती ते वार्षिक कार्यअहवालातून देत आले. कधी मुख्यमंत्री, कधी विरोधी पक्षाचे नेते, कधी पत्रकार मित्र यांच्या हस्ते त्यांच्या कार्यअहवालांचं प्रकाशन होत असे आणि मतदारसंघात ते वितरित केले जात. 

विशेष म्हणजे, राज्यपाल झाल्यानंतरही हा वार्षिक अहवाल बंद झाला नाही. राज्यपालपद म्हणजे शोभेचं पद, असं मानलं जातं. स्वाक्षरी करणं एवढंच त्यांचं काम असतं, असा अनेकांचा समज आहे. परंतु, राष्ट्रपतींचा प्रतिनिधी या नात्याने त्यांच्याकडे सर्वाधिक अधिकार असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्या अधिकारांचा वापर करून आपण काय कामं केली, याचा अहवाल राम नाईक यांनी यंदाही प्रकाशित केला आहे.

२०१८-१९ या वर्षात राम नाईक यांना ५,२५७ नागरिकांना राजभवनात भेटले.  ३७,१०७ पत्रं वेगवेगळ्या माध्यमांमधून आली आणि त्यावर नियमांनुसार कार्यवाही करण्यात आली. उत्तर प्रदेशातील शेकडो कार्यक्रमांना राम नाईक उपस्थित राहिले. २६ विद्यापीठांच्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे होते. कुष्ठरुग्णांना मिळणारा ३०० रुपयांचा भत्ता २५०० रुपये करण्याचा, त्यांना पक्की घरं देण्याचा निर्णय राज्य सरकारने आपल्या सूचनेनुसार घेतल्याचं राम नाईक यांनी म्हटलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव योग्य प्रकारे लिहिलं जावं, यासाठीही त्यांनी पाठपुरावा केला होता आणि त्याला यशही आलं. अशी सर्व कामं त्यांनी अहवालात नमूद केली आहेत. 

आमदार, खासदार असताना पुढील निवडणुकांच्या दृष्टीने कार्यअहवाल उपयुक्त ठरत होते. परंतु, राज्यपाल झाल्यानंतरही ही परंपरा कायम ठेवून त्यांनी आपल्यातील खऱ्या 'लोकप्रतिनिधी'चंच दर्शन घडवलं आहे.

आमदार असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राम नाईक विधानसभेतील सगळी आयुधं वापरत असत. सभागृह संपताना एखादा सदस्य अर्धा तास चर्चेचा प्रस्ताव मांडू शकतो. त्या अंतर्गत राम नाईक यांनी अनेक विषय मार्गी लावले होते. मुंबईतील झोपडपट्टीत दुमजली शौचालयं बांधावी, कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत स्वतंत्र मतदान केंद्र असावं, हे विषय त्यांनी अर्धा तासांच्या चर्चेअंतर्गत मांडले होते आणि पूर्णत्वासही नेले होते.  

टॅग्स :Ram Naikराम नाईकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUttar Pradeshउत्तर प्रदेश