शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

राम नाईक यांची 'काम की बात'; ४० वर्षांपासून सुरू आहे आदर्श परंपरा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:27 IST

१९७८ पासून सुरू असलेली एक परंपरा राम नाईक यांनी २०१९ पर्यंत अखंड सुरू ठेवलीय.

ठळक मुद्देराम नाईक दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल जनतेपुढे सादर करत आलेत. राज्यपाल म्हणून आपण वर्षभरात काय-काय कामं केली, याचा अहवाल त्यांनी सलग पाचव्या वर्षी प्रकाशित केला आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे गेली पाच वर्षं उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, भाजपाचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि मग राज्यपाल असा प्रवास त्यांनी केलाय. जवळपास ४०-४५ वर्षं ते सक्रिय राजकारणात आहेत. या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. जय-पराजय झाले. परंतु, १९७८ पासून सुरू असलेली एक परंपरा त्यांनी २०१९ पर्यंत अखंड सुरू ठेवलीय. राम नाईक दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल जनतेपुढे सादर करत आलेत. अगदी राज्यपाल म्हणून आपण वर्षभरात काय-काय कामं केली, याचा अहवाल त्यांनी सलग पाचव्या वर्षी प्रकाशित केला आहे. हा पायंडा सर्वच लोकप्रतिनिधींसाठी, राज्यपालांसाठी अनुकरणीय ठरणारा आहे. 

जनतेच्या समस्या समजाव्यात, त्यांच्याशी संपर्क राहावा म्हणून सुरुवातीच्या काळात अनेक वर्षं राम नाईक लोकल ट्रेनने प्रवास करत असत. मंत्री झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते शक्य नव्हतं. परंतु, आपल्या मतदारसंघासाठी आपण काय काम केलं, केंद्रीय मंत्री असताना महाराष्ट्रासाठी, देशासाठी काय निर्णय घेतले याची माहिती ते वार्षिक कार्यअहवालातून देत आले. कधी मुख्यमंत्री, कधी विरोधी पक्षाचे नेते, कधी पत्रकार मित्र यांच्या हस्ते त्यांच्या कार्यअहवालांचं प्रकाशन होत असे आणि मतदारसंघात ते वितरित केले जात. 

विशेष म्हणजे, राज्यपाल झाल्यानंतरही हा वार्षिक अहवाल बंद झाला नाही. राज्यपालपद म्हणजे शोभेचं पद, असं मानलं जातं. स्वाक्षरी करणं एवढंच त्यांचं काम असतं, असा अनेकांचा समज आहे. परंतु, राष्ट्रपतींचा प्रतिनिधी या नात्याने त्यांच्याकडे सर्वाधिक अधिकार असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्या अधिकारांचा वापर करून आपण काय कामं केली, याचा अहवाल राम नाईक यांनी यंदाही प्रकाशित केला आहे.

२०१८-१९ या वर्षात राम नाईक यांना ५,२५७ नागरिकांना राजभवनात भेटले.  ३७,१०७ पत्रं वेगवेगळ्या माध्यमांमधून आली आणि त्यावर नियमांनुसार कार्यवाही करण्यात आली. उत्तर प्रदेशातील शेकडो कार्यक्रमांना राम नाईक उपस्थित राहिले. २६ विद्यापीठांच्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे होते. कुष्ठरुग्णांना मिळणारा ३०० रुपयांचा भत्ता २५०० रुपये करण्याचा, त्यांना पक्की घरं देण्याचा निर्णय राज्य सरकारने आपल्या सूचनेनुसार घेतल्याचं राम नाईक यांनी म्हटलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव योग्य प्रकारे लिहिलं जावं, यासाठीही त्यांनी पाठपुरावा केला होता आणि त्याला यशही आलं. अशी सर्व कामं त्यांनी अहवालात नमूद केली आहेत. 

आमदार, खासदार असताना पुढील निवडणुकांच्या दृष्टीने कार्यअहवाल उपयुक्त ठरत होते. परंतु, राज्यपाल झाल्यानंतरही ही परंपरा कायम ठेवून त्यांनी आपल्यातील खऱ्या 'लोकप्रतिनिधी'चंच दर्शन घडवलं आहे.

आमदार असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राम नाईक विधानसभेतील सगळी आयुधं वापरत असत. सभागृह संपताना एखादा सदस्य अर्धा तास चर्चेचा प्रस्ताव मांडू शकतो. त्या अंतर्गत राम नाईक यांनी अनेक विषय मार्गी लावले होते. मुंबईतील झोपडपट्टीत दुमजली शौचालयं बांधावी, कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत स्वतंत्र मतदान केंद्र असावं, हे विषय त्यांनी अर्धा तासांच्या चर्चेअंतर्गत मांडले होते आणि पूर्णत्वासही नेले होते.  

टॅग्स :Ram Naikराम नाईकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUttar Pradeshउत्तर प्रदेश