शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
4
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
5
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
6
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
7
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
8
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
9
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
10
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
11
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
12
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
13
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
14
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
15
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
16
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
17
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
18
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
19
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
20
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest: उत्तर प्रदेशात आंदोलनाचा भडका, ६ ठार, १२ जखमी; दिल्लीतही हिंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 06:35 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : जाळपोळ, दगडफेक, लाठीमार, गोळीबार

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्धचे आंदोलन देशाच्या विविध भागांमध्ये पेटतच चालले असून, उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या आंदोलनांत ६ जण मरण पावले. आंदोलनात प्रचंड जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचार झाला. पोलीस गोळीबारात ६ आंदोलक मरण पावल्याने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. दिल्लीत दिवसभर शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाने संध्याकाळनंतर उग्र वळण घेतले आणि आंदोलकांनी काही वाहने पेटवून दिली. उत्तर प्रदेशातही अनेक वाहने जाळण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली आणि जोरदार लाठीमारही केला. मेरठमध्ये पोलीस चौकी पेटवण्यात आल्याचे वृत्त आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर, भदोई, वाराणसी, गाझियाबाद, फिरोजाबाद, संभळ, मुझफ्फरनगर, कानपूर, हापूर, शामली, प्रयागराज, बुलंदशहर, मेरठ, फारुखाबाद, बिजनौर, हमीरपूर, देवबंद या १७ जिल्ह्यांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात लोक दुपारपासून रस्त्यांवर उतरायला सुरुवात झाली. आज शुक्रवारचा महत्त्वाचा नमाज असल्याने पोलिसांनी सर्व मशिदींपुढे प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. काही ठिकाणी पोलिसांनी मोटारसायकलवरून शहरांतून अनेक फेऱ्या मारल्या. त्यामुळे सर्वत्र तणाव निर्माण झाला.

नमाज आटोपल्यानंतर मुस्लीम समाज आणि कायद्याविरोधातील आंदोलकांनी शहरांतून मोर्चे सुरू केले. सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, राज्यघटना वाचवा अशा घोषणा देणाºया बºयाच आंदोलकांच्या हातात भारतीय तिरंगाही होता. जमावबंदीचे कारण सांगून मोर्चे अडवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू करताच आंदोलक व पोलीस यांच्यात झटापट सुरू झाली. पोलिसांनी त्यापैकी काहींना अटक केली, तर काहींवर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलन चिघळले आणि आंदोलकांनी रस्ते अडवून ठिकठिकाणी दगडफेक केली, तर काही ठिकाणी टायर्स जाळले. त्यातच समाजकंटकांनी वाहने जाळायला सुरुवात केली आणि पोलिसांवर दगडफेक केली.

त्यामुळे पोलिसांनी सर्व शहरांत आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. त्यामुळेही आंदोलक बधेनात. परिणामी काही ठिकाणी अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी सहा ते सात शहरांमध्ये गोळीबार केला. त्यात ६ आंदोलक मरण पावले असून, १२ जण जखमी झाले आहेत. मुझफ्फरनगरमध्ये दोन जण तर मेरठ व फिरोजाबादमध्ये मिळून चार जण मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले.संपूर्ण उत्तर प्रदेशात जमावबंदी लागू केली असताना हजारो लोक या कायद्याच्या विरोधात रोज आंदोलन करीत आहेत. गुरुवारीही तिथे झालेल्या आंदोलनात वाहने पेटवून देण्यात आली होती. त्यामुळे आता काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

भाजपचे अनेक नेते व मंत्री यांनी आंदोलनाच्या काळात कोणतीही प्रक्षोभक विधाने करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. आंदोलन पेटले असतानाच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी आम्ही कोणत्याही स्थितीती नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नागरिक नोंदणी कायदा लागू करणारच, असे म्हटले होते. भाजपच्या कर्नाटकातील एका मंत्र्यानेही आता बहुसंख्य समाजाचा संयम सुटू लागला असून, ही परिस्थिती गोध्रासारखी असल्याचे म्हटले आह. अशा विधानांनी आणखी भडका उडण्याची भीती केंद्राला वाटत आहे.

संयम बाळगण्याच्या वृत्तवाहिन्यांना सूचनासरकारने ठिकठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. पण वृत्तवाहिन्यांवरून लोकआंदोलने पाहत आहेत. त्यामुळे वृत्तवाहिन्यांनीही संयम बाळगावा, यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात सल्ला वा सूचना जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे..आंदोलकांशी चर्चेला सरकार तयारदेशभर पसरत चाललेले आंदोलन पाहून केंद्र सरकारने आता आंदोलकांशी चर्चाकरण्याची तयारी चालविली आहे. आंदोलकांनी पुढे यावे आणि आमच्याशी चर्चा करावी, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार आहोत, अशी भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा केला असला तरी त्याचे नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणीपूर्वी आम्ही सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकू, असे सरकारने म्हटले आहे. मात्रअशा चर्चेसाठी सरकारने कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.दडपशाहीचा निषेधजनतेचे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकार दडपशाहीचा वापर करीत आहे. पण आम्ही जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी इंडिया गेटपाशी धरणे देणाºया आंदोलकांची भेटही घेतली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश