शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

प्रार्थनास्थळांत गेल्यावरही मास्क वापरा -हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:33 AM

आवश्यक बंधने पाळण्याचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात लोकांनी प्रार्थनास्थळांमध्ये गेल्यानंतरही मास्क कायम ठेवावा. मास्क घालण्यास देवाने मनाई केलेली नाही. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लोकांनी आवश्यक ती सर्व बंधने पाळावीत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.

देशातील कोरोनाची स्थिती व या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने केलेली तयारी याबाबत सोशल मीडियावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. हर्षवर्धन यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, केवळ मंदिरे किंवा अन्य प्रार्थनास्थळांतच नव्हे तर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाताना लोकांनी मास्क घातला पाहिजे. प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करताना काय दक्षता घ्यावी, याबद्दल केंद्र सरकारने याआधीच सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होत आहे किंवा नाही, हे पाहणे ही राज्य सरकारांची जबाबदारीआहे.डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा श्वसनसंस्थेव्यतिरिक्त हृदय व अन्य अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. त्या निष्कर्षाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. अशा संशोधनातील निष्कर्षांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ मंडळींची एक समिती नेमली आहे. ते या मुद्यांचा विचार करून केंद्र सरकारला योग्य त्या शिफारसी करीत असतात. त्यानुसार मग सरकार आपली धोरणे आखते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही कोरोना संसर्गाच्या विविध दुष्परिणामांचा अभ्यास करावा, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरपीचामोठ्या प्रमाणावर वापर नकोडॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर व प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या सुरू आहे. त्याचे प्रमाण कमी करावे, असे विविध राज्य सरकारे तसेच खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली