शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 20:58 IST

आज आमदार हत्याकांडातील साक्षीदार उमेश पालच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार झाला.

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेत शनिवार(25 फेब्रुवारी) रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे रौद्र रुप पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी त्यांना राज्यातील गुन्हेगारीवर बोलण्यास प्रवृत्त केले. त्यांनी उमेश पाल खून प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. प्रत्युत्तर म्हणून योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा खरपून समाचार घेतला. 'माफिया कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना जमीनदोस्त केले जाईल,' असे योगींनी ठणकावून सांगितले. त्याच्या अवघ्या दोन दिवसांनीच या विधानाचे कृतीत रुपांतर झाले. 

आज उमेश पालच्या हत्येतील एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला आहे. याद्वारे सरकारे पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की, राज्यात गुंड आणि माफियांविरोधात 'झिरो टॉलरन्स' पॉलिसी असेल. विशेष म्हणजे, यूपीमध्ये 'योगीराज' सुरू झाल्यापासून गुंड आणि माफियांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तुम्ही आकडे बघितले तर योगी सरकारमध्ये मार्च 2017 ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत, सुमारे 170 गुन्हेगार मारले गेले आहेत. तसेच, 4500 हून अधिक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. 

गरज पडली तर गाडीही पलटी होईल आणि गोळीही चालेल, असे योगी सार्वजनिक मंचांवर सांगत असतात. बाईकेरूच्या घटनेनंतर मुख्य आरोपी विकास दुबे याचे वाहन उलटून चकमकीत तो ठार झाला. त्याच संदर्भात योगी यांनी हे वक्तव्य केले होते. वाराणसीत तैनात असलेले उपनिरीक्षक अजय यादव यांची गोळ्या झाडून हत्या करून त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर लुटण्यात आली तेव्हाही पोलिसांनी आक्रमक वृत्ती दाखवली. पिस्तुल लुटणारे हे हल्लेखोर ऑपरेशन पाताल लोक अंतर्गत चकमकीत मारले गेले. वाराणसीमध्ये बिहारमधील कुख्यात मनीष आणि रजनीश यांना चकमकीत मारणाऱ्या पोलिस पथकाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा