शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

IB मध्ये नोकरी, आता धार्मिक सत्संग; कोण आहेत भोले बाबा? ज्यांच्या कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 21:03 IST

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात आयोजित सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन सूमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.

UP Hathras stampede 2024: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलराई गावातील सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत सूमारे 100 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. नारायण साकार हरी किंवा साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा, यांच्या सत्संगात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला असेल की, हे भोले बाबा नेमके कोण आहेत?

नारायण साकार हरी किंवा साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबाचा जन्म उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात झाला. भोले बाबा स्वतःला इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे माजी कर्मचारी असल्याचे सांगतात. असा दावा केला जातो की, 26 वर्षांपूर्वी बाबांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोले बाबांचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत. विशेष म्हणजे, इतर बाबा/संत/कथाकारांप्रमाणे भोले बाबा सोशल मीडिया अॅक्टिव्ह नाहीत. बाबांचे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत खाते नाही. त्यांच्या भक्तांचा असा दावा आहे की, भोले बाबांचे त्यांच्या क्षेत्रात अनेक अनुयायी आहेत.

संबंधित बातमी- मृतदेहांचा खच, नातेवाईकांचा आक्रोष, हारसमधील दुर्घटनास्थळावर भयावह दृश्य

पश्चिम उत्तर प्रदेशातील अलीगढ आणि हाथरस जिल्ह्यात दर मंगळवारी नारायण साकार हरी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्यात हजारो लोक जमतात. या वेळी भोले बाबांशी संबंधित हजारो स्वयंसेवक भक्तांसाठी खाण्यापिण्यासह आवश्यक व्यवस्था करतात. कोरोनाच्या काळात बंदी असतानाही हजारोंचा जनसमुदाय जमवून भोले बाबा प्रसिद्धीच्या झोतात आले. दरम्यान, आज मानव मंगल मिलन समागम समितीने हातरसमधील मुगलगढी भागात असलेल्या फुलराई गावात भोले बाबाच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 50 हजारांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती.

प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त लोक कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये सूमारे 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 200 हून अधिक लोक जखमी आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. आग्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगडचे विभागीय आयुक्त यांचे पथक या घटनेची चौकशी करणार आहे. यूपी सरकारचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय एडीजी, आग्रा आणि आयुक्त, अलिगड यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिसAccidentअपघात