शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

कृषी विधेयकांवरून राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 06:55 IST

उपसभापतींनी फेटाळताच तृणमूलचे डेरेक ओब्रायन हे उपसभापतींच्या खुर्चीकडे धावून गेले व तेथील नियम पुस्तिका सभापतींच्या चेहऱ्याकडे फेकली. मात्र मार्शलने ती मध्येच रोखली. द्रमुकचे तिरूची शिवा हेही डेरेक यांच्याबरोबर होते. त्यांनी व इतरांनी कागदपत्रे फाडून हवेत फेकली.

नवी दिल्ली : राज्यसभेत रविवारी प्रचंड रणकंदन झाले. कृषी विधेयकांवरून विरोधकांनी माइक तोडला, कागदपत्रे फाडली, धक्काबुक्की केली. मात्र, या विरोधाला न जुमानता सरकारने प्रचंड गदारोळातच विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. आजच्या प्रकारावर संतप्त झालेल्या विरोधकांनी उपसभापतींवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला, तर गदारोळ करणारांवर कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याचे सभापतींनी म्हटले आहे.शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, २०२० ही वादग्रस्त ठरलेली दोन कृषी विधेयके राज्यसभेत रविवारी गदारोळात मंजूर करण्यात आली. या वर्षी ५ जून रोजी जारी केलेल्या दोन अध्यादेशांची जागा आता या विधेयकांनी घेतली आहे.

ही विधेयके संमत होत असताना सभागृहात खूप गोंधळाचे वातावरण होते. कारण, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी टेबलवरील कागदपत्रे हिसकावून घेतली व सभापतींचा मायक्रोफोन तोडून टाकला. विरोधी पक्ष विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी करत होते, तेव्हा उपसभापती हरिवंश यांनी विधेयके संमत होण्यासाठी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवून घेण्यासाठी सदस्यांची संमती मागितली आणि गदारोळ सुरू झाला. विरोधी सदस्यांनी सभागृह वेळापत्रकानुसार तहकूब करण्याची मागणी केली. तथापि, हरिवंश यांनी कामकाज सुरूच ठेवले. त्यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधेयकांवरील चर्चेला तुमचे उत्तर देणे सुरूच ठेवा, असे सांगितले. यावर विरोधकांनी जोरदार विरोध सुरु केला.

ही विधेयके सभागृहाच्या समितीकडे पाठवण्याचा चार विरोधी पक्षांचा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. मात्र, यावर मतदान घेण्याची मागणी काँग्रेस, तृणमूल, माकपा, द्रमुक सदस्यांनी केली. ती उपसभापतींनी फेटाळताच तृणमूलचे डेरेक ओब्रायन हे उपसभापतींच्या खुर्चीकडे धावून गेले व तेथील नियम पुस्तिका सभापतींच्या चेहऱ्याकडे फेकली. मात्र मार्शलने ती मध्येच रोखली. द्रमुकचे तिरूची शिवा हेही डेरेक यांच्याबरोबर होते. त्यांनी व इतरांनी कागदपत्रे फाडून हवेत फेकली.

उपसभापती हरिवंश यांनी सदस्यांना आपापल्या जागेवर जाण्याचे व कोरोनाची नियमावली पाळण्याचे आवाहन केले. तरीही गदारोळ चालूच राहिला. त्यामुळे सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृह पुन्हा सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. तरीही हरिवंश यानी विधेयके आवाजी मतदानासाठी ठेवली. एक विधेयक मंजूर होताच विरोधी सदस्यांनी राज्यसभा अधिकाऱ्यांच्या टेबलवर चढण्याचा प्रयत्न केला. नंतर दुसरेही विधेयक मंजूर झाले व विरोधकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले.उपसभापतींवर अविश्वास प्रस्तावराज्यसभेत रविवारी झालेल्या कामकाजावर प्रचंड संतप्त झालेल्या १२ विरोधी पक्षांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वरिष्ठ सभागृहात ज्या पद्धतीने रविवारी दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.गदारोळ करणाºयांवर कारवाईचा विचारराज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हे कमालीचे नाराज असल्याचे समजते. गदारोळ करणाºयांवर कारवाई करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.पुन्हा एकदा सांगतो, एमएसपी व्यवस्था कायम राहील. सरकारी खरेदी कायम राहील. आम्ही इथे शेतकºयांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानजो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकºयांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे.- राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाFarmerशेतकरी