शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 17:43 IST

एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते.

नवी दिल्ली - तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, भारतात राजकीय शाब्दिक द्वंद्व सुरू झाले आहे. भारताची तुलना अफगाणिस्तानातील परिस्थितीशी केल्यावरून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. ओवेसींना अफगाणिस्तानला पाठवणेच योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी, एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते. (Union minister Shobha Karandlaje furious over indias comparison with afghan situation said send owaisi to Afghanistan)

महर्षी वाल्मिकींची तालिबान्यांशी केली तुलना; शायर मुनव्वर राणाविरोधात गुन्हा दाखल

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या, "ओवेसींना त्यांच्या महिला आणि समाजाच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानात पाठवणेच योग्य आहे." यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विर्देशही दिले होते, की भारत केवळ अफगाणिस्तानच्या नागरिकांनाच संरक्षण देणा नाही, तर येथे येऊ इच्छिनाऱ्या शीख आणि हिंदू अल्पसंख्यकांनाही आश्रय देईल.

काय म्हणाले होते ओवेसी -ओवेसी म्हणाले होते, 'एका अहवालानुसार, भारतात 9 पैकी एका मुलीचा मृत्यू पाच वर्षांची होण्यापूर्वीच होतो. पण त्यांना (केंद्र सरकार) अफगाणिस्तानात महिलांसोबत जे सुरू आहे, त्याची चिंता आहे. हे येथे होत नाही का?

 तालिबानचा विरोध वाढला; लोक रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरांत निदर्शने

तालिबानने रविवारीच अफगाणिस्तानात आपल्या विजयाची घोषणा केली होती.  सुमारे दोन दशकांनंतर तालिबानने पुन्हा सत्ता बळकावल्यानंतर भयभीत झालेले अफगाण नागरिक देश सोडून पळून जात आहेत.

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानBJPभाजपाterroristदहशतवादी