शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
4
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
5
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
6
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
7
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
8
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
9
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
10
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
12
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
13
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
14
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
15
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
16
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
17
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
18
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
19
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
20
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

महाराष्ट्रात आदिवासी विकासाचा निधी अखर्चित, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 11:46 AM

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांना घरातून राजकीय वारसा  लाभला आहे.

सुरेश भुसारी - नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला कोट्यवधी रुपयांचा निधी पाठविला आहे; परंतु हा निधी अद्यापही अखर्चित असल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांना घरातून राजकीय वारसा  लाभला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या पवार पहिल्यांदा २०१९ मध्ये भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यांना गेल्या वर्षी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद मिळाले. कोरोना काळात, तसेच देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधार करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे मत आहे. आरोग्य, कोरोना काळातील आव्हाने, तसेच महाराष्ट्रातील आरोग्य समस्यांबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत.कोरोनाची तिसरी लाट लवकर ओसरली व या लाटेचे स्वरूप अधिक गंभीर नव्हते. काय कारण आहे? - कोरोना आपल्यासाठी हा नवा रोग होता. आपल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगात या विषाणूची माहिती फारशी कुणाला नव्हती. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण आपल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर अधिक भर दिला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना अधिक गंभीर संकटाचा सामना करावा लागला. या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव तिसऱ्या लाटेच्या वेळी कामी आले. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची व काही विशिष्ट औषधींची गरज असते. याची पूर्तता केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्यामुळे तिसरी लाट लवकर ओसरण्यास मदत झाली.यावर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्याच्या तरतुदीमध्ये कपात झालेली आहे. यामागची कारणे काय आहेत? - आरोग्य खात्याच्या तरतुदीमध्ये कपात झालेली नाही. गेल्या वर्षी आपल्याला लोकांचे कोरोना लसीकरण करावयाचे होते. त्यामुळे आरोग्य खात्याला अधिक तरतुदीची गरज होती. आज या तरतुदीमुळेच देशात लसीचे १६५ कोटी डोस आपण देऊ शकलो. अनेकांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात लसीकरणावरील खर्च कमी होणार आहे. यामुळे यावर्षीच्या तरतुदींमध्ये कपात झालेली दिसून येते. महाराष्ट्रात कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे. यावर केंद्राच्या काय उपाययोजना आहेत? - महाराष्ट्रात हा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये हा प्रश्न आपल्याला अधिक गंभीर असल्याचे दिसून  येतो. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला निधी दिलेला आहे. जवळपास १,१०० कोटी रुपयांचा हा निधी आहे. यापैकी बराचसा निधी अद्यापही अखर्चित आहे. हा निधी महाराष्ट्रात खर्च होण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाच्या लाटा वारंवार येत आहेत. त्या थोपविण्यासाठी काही विशेष प्रयत्न होत आहेत? - यावर अशी कोणतीची एक उपाययोजना नाही. कोरोना रुग्ण ट्रेस करणे, त्यांची चाचणी करणे व त्यांच्यावर उपचार करणे हाच यावर उपाय आहे. यासाठी देशातील प्रयोगशाळांचे जाळे मजबूत केलेले आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे. यामुळेच आपण पाहत आहोत की, तिसऱ्या लाटेचा फारसा प्रभाव जाणवला नाही. ओमायक्रॉनवर आपण सहज मात करू शकलो. लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे आपण तिसऱ्या लाटेचा समर्थपणे सामना केला आहे. 

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य