शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची पावती फाटणार का?; नितीन गडकरी हसले आणि म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 2:33 PM

नवी दिल्ली/ मुंबईः  मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहीनीने केंद्रीयमंत्री नितिन गडकरी ...

ठळक मुद्देगडकरी म्हणाले, प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने चालत असते.यावेळी गडकरींना महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले.यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांसंदर्भातही चर्चा केली.

नवी दिल्ली/मुंबईः मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहीनीने केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यात, "महाराष्ट्रातील सरकार नियमाने चालत आहे का? त्याचीही पावती फाटण्याची वेळ आली आहे, असे वाटते का?" असा प्रश्न आला. यावर, गडकरी एकदम हसले आणि त्यांनी या प्रश्नाला मोकळेपणाने उत्तर दिले.

गडकरी म्हणाले, प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने चालत असते. मला वाटते, की देश अत्यंत गंभीर संकटातून जात आहे. कोरोना संकटाशी लढाई सुरू आहे. विरोधकांचे कामच असते टीका करणे. देशासमोर आर्थिक संकट आहे. त्याच्याशीही लढाई सुरू आहे. सध्या देशातील गरीब, मजूर, शेतकरी अत्यंत दुःखी आहेत. अशा वेळी, सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्रित येऊन या सर्वांना कशापद्धतीने खूश करता येईल, या सर्वांच्या समस्यां कशा सोडवता येतील आणि परिस्थितीतून मार्ग कसा निघेल, यासाठी काम करायला हवे. काही दिवसांसाठी राजकारण थांबवावे. जेव्हा ही समस्या संपेल, तेव्हा लोकशाही आहे, ज्यांच्यात जेवढा जोर आहे, त्याने तसा प्रयत्न करावा. 

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

यावेळी महाराष्ट्रातील राजकारणावर पुन्हा प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले, मी जास्तवेळ दिल्लीतच असतो. महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि मुंबईत माझे फारसे जानेही नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष कोरोना संकटावर आहे. पंतप्रधानांनी मझ्यावर काही जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. केवळ त्यांच्याच संपर्कात मी असतो. बाकी राजकारणासंदर्भात मला माहीत नाही.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

नारायण राणेंनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांचा तुम्हाला फोन आला होता का? असे विचारले असता. हो आला होता. ते फार चांगले नेते आहेत. त्यांच्याशी माझे नेहमीच बोलने होत असते. ते महाराष्ट्रातील एक हुशार आणि अभ्यासू नेते आहेत, असे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांसंदर्भातही चर्चा केली. 

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

आजतक या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या 'e-अजेंडा' कार्यक्रमातील 'विकासाचा अग्निपथ' या सत्रात गडकरी सहभागी झाले होते.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईdelhiदिल्ली