शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

'एका सदस्याला राजकारणात १३ वेळा लॉन्च केले'; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 18:22 IST

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. अविश्वास प्रस्तावाची तीन उदाहरणे आहेत. दोन युपीए सरकारच्या विरोधात तर एक एनडीए विरुद्ध. १९९३मध्ये नरसिंह सरकार होते. त्याच्या विरोधात प्रस्ताव आला होता. त्यांनी अविश्वास ठराव जिंकला. २००८मध्ये मनमोहन सरकार विश्वासदर्शक ठराव घेऊन आले. त्यांच्याकडे बहुमत नाही असे वातावरण होते. पण खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली आणि सरकार वाचले. १९९९मध्ये अटल सरकार होते. अविश्वास प्रस्ताव आला. काँग्रेसने जे केले ते भाजपाही करू शकली असती, पण अटलजींनी आपले म्हणणे मांडले आणि संसदेचा निर्णय मान्य केला, असं अमित शाह यांनी सांगितले. 

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर देखईल निशाणा साधला. ते म्हणाले की, या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला १३ वेळा राजकारणात लॉन्च केले गेले. मात्र प्रत्येक वेळी ते अयशस्वी झाले. तो नेता एका गरीब आई कलावती (बुंदेलखंड, महोबा) च्या घरी जेवणासाठी गेला. संसदेत त्यांनी आई कलावती यांच्या गरिब परिस्थितीचे वर्णन केले. त्यानंतर सहा वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण त्या कलावतीसाठी काहीच केले नाही. त्या कलावतीला घर, वीज, गॅस, धान्य, शौचालय, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. ज्या कलावतींच्या घरी तुम्ही जेवायला गेलात, तिचाही मोदींवर अविश्वास नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबी तशीच राहिली. पण मोदींनी गरिबी पाहिली होती, त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या समजल्या. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षांत ११ कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालये दिली. लोक क्लोराईडयुक्त पाणी पितात. मोदींनी हर घर जल योजनेतून १२ कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी आणले. काँग्रेस कर्जमाफीसाठी लॉलीपॉप देत असे, तर शेतकऱ्याला कर्जमाफी हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसने नुसत्या घोषणा केल्या, पण भाजपाने अंमलबजावणी केली, असे अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधी