शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

'एका सदस्याला राजकारणात १३ वेळा लॉन्च केले'; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 18:22 IST

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. अविश्वास प्रस्तावाची तीन उदाहरणे आहेत. दोन युपीए सरकारच्या विरोधात तर एक एनडीए विरुद्ध. १९९३मध्ये नरसिंह सरकार होते. त्याच्या विरोधात प्रस्ताव आला होता. त्यांनी अविश्वास ठराव जिंकला. २००८मध्ये मनमोहन सरकार विश्वासदर्शक ठराव घेऊन आले. त्यांच्याकडे बहुमत नाही असे वातावरण होते. पण खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली आणि सरकार वाचले. १९९९मध्ये अटल सरकार होते. अविश्वास प्रस्ताव आला. काँग्रेसने जे केले ते भाजपाही करू शकली असती, पण अटलजींनी आपले म्हणणे मांडले आणि संसदेचा निर्णय मान्य केला, असं अमित शाह यांनी सांगितले. 

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर देखईल निशाणा साधला. ते म्हणाले की, या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला १३ वेळा राजकारणात लॉन्च केले गेले. मात्र प्रत्येक वेळी ते अयशस्वी झाले. तो नेता एका गरीब आई कलावती (बुंदेलखंड, महोबा) च्या घरी जेवणासाठी गेला. संसदेत त्यांनी आई कलावती यांच्या गरिब परिस्थितीचे वर्णन केले. त्यानंतर सहा वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण त्या कलावतीसाठी काहीच केले नाही. त्या कलावतीला घर, वीज, गॅस, धान्य, शौचालय, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. ज्या कलावतींच्या घरी तुम्ही जेवायला गेलात, तिचाही मोदींवर अविश्वास नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबी तशीच राहिली. पण मोदींनी गरिबी पाहिली होती, त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या समजल्या. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षांत ११ कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालये दिली. लोक क्लोराईडयुक्त पाणी पितात. मोदींनी हर घर जल योजनेतून १२ कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी आणले. काँग्रेस कर्जमाफीसाठी लॉलीपॉप देत असे, तर शेतकऱ्याला कर्जमाफी हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसने नुसत्या घोषणा केल्या, पण भाजपाने अंमलबजावणी केली, असे अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधी