शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

Union Budget 2019: गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 6:05 AM

या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल.

नवी दिल्ली : गरिबांचे सबलीकरण तसेच युवकांना उज्ज्वल भविष्य प्रदान करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले. ते म्हणाले की, आशा व आत्मविश्वास जागविणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासासाठी समाजातील तळागाळातल्या लोकांचे पॉवरहाऊसमध्ये रूपांतर करण्याचे काम अर्थसंकल्प करेल. पर्यावरण, वाहतूक, क्लीन एनर्जी या विषयांवर त्यामध्ये लक्ष देण्यात आले आहे. कृषीक्षेत्रामध्ये रचनात्मक बदल करण्यासाठी अर्थसंकल्पाद्वारे निश्चित मार्ग आखून दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवभारताच्या निर्माणाचे महत्त्वाचे दस्तावेज असलेले हे ग्रीन बजेट देशाच्या विकासाला आणखी गती देईल. त्याचा मोठा फायदा मध्यमवर्गाला मिळेल. कररचना सोपी करणे तसेच देशात अद्ययावत पायाभूत सुविधा उभारणे ही कामे या अर्थसंकल्पातून साध्य होतील. या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल. गरीब, दलित, शेतकरी, शोषित व असंघटित लोकांच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याचा मनोदय असून तो आम्ही साध्य करणारच.श्रीमंतधार्जिणा अर्थसंकल्प : राहुल गांधीवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गाठून पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प श्रीमंतधार्जिणा असेल. सीतारामन या अंबानीधार्जिण्या की शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या राहाणा-या असतील असे पत्रकारांनी विचारताच राहुल गांधी यांनी सांगितले की, हा चांगला प्रश्न आहे.नवभारताच्या प्रगतीचा पाया - अमित शहा‘नवभारत सर्वसमावेशक व प्रगत राष्ट्र होण्यासाठी पाया रचण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. नवभारताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला दृष्टिकोन स्पष्ट करणारा व १३० कोटी भारतीयांच्या मेहनतीला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, युवक, महिला, गरीब आर्थिक क्षेत्र, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा व अन्य क्षेत्रामध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जे उत्तम काम झाले त्याची झलकही या अर्थसंकल्पामध्ये दिसते, असे अमित शहा यांनी सांगितले.संरक्षण खर्चाबाबत मौन : पी. चिदम्बरमसंरक्षणावर किती खर्च करणार याची आकडेवारी अर्थसंकल्पात नाही. हा जनतेवर अन्याय आहे अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केली. ते म्हणाले की, देशाचा कृषी विकासदर २.९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. तो ४ टक्क्यांपर्यंत नेण्याचा मनोदय मोदी सरकारने व्यक्त केला असला तरी ते साध्य कसे करणार याबद्दल मौन बाळगले आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदी