शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

Union Budget 2019: गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 06:10 IST

या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल.

नवी दिल्ली : गरिबांचे सबलीकरण तसेच युवकांना उज्ज्वल भविष्य प्रदान करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले. ते म्हणाले की, आशा व आत्मविश्वास जागविणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासासाठी समाजातील तळागाळातल्या लोकांचे पॉवरहाऊसमध्ये रूपांतर करण्याचे काम अर्थसंकल्प करेल. पर्यावरण, वाहतूक, क्लीन एनर्जी या विषयांवर त्यामध्ये लक्ष देण्यात आले आहे. कृषीक्षेत्रामध्ये रचनात्मक बदल करण्यासाठी अर्थसंकल्पाद्वारे निश्चित मार्ग आखून दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवभारताच्या निर्माणाचे महत्त्वाचे दस्तावेज असलेले हे ग्रीन बजेट देशाच्या विकासाला आणखी गती देईल. त्याचा मोठा फायदा मध्यमवर्गाला मिळेल. कररचना सोपी करणे तसेच देशात अद्ययावत पायाभूत सुविधा उभारणे ही कामे या अर्थसंकल्पातून साध्य होतील. या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल. गरीब, दलित, शेतकरी, शोषित व असंघटित लोकांच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची बनविण्याचा मनोदय असून तो आम्ही साध्य करणारच.श्रीमंतधार्जिणा अर्थसंकल्प : राहुल गांधीवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गाठून पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प श्रीमंतधार्जिणा असेल. सीतारामन या अंबानीधार्जिण्या की शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या राहाणा-या असतील असे पत्रकारांनी विचारताच राहुल गांधी यांनी सांगितले की, हा चांगला प्रश्न आहे.नवभारताच्या प्रगतीचा पाया - अमित शहा‘नवभारत सर्वसमावेशक व प्रगत राष्ट्र होण्यासाठी पाया रचण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. नवभारताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला दृष्टिकोन स्पष्ट करणारा व १३० कोटी भारतीयांच्या मेहनतीला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, युवक, महिला, गरीब आर्थिक क्षेत्र, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा व अन्य क्षेत्रामध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जे उत्तम काम झाले त्याची झलकही या अर्थसंकल्पामध्ये दिसते, असे अमित शहा यांनी सांगितले.संरक्षण खर्चाबाबत मौन : पी. चिदम्बरमसंरक्षणावर किती खर्च करणार याची आकडेवारी अर्थसंकल्पात नाही. हा जनतेवर अन्याय आहे अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केली. ते म्हणाले की, देशाचा कृषी विकासदर २.९ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. तो ४ टक्क्यांपर्यंत नेण्याचा मनोदय मोदी सरकारने व्यक्त केला असला तरी ते साध्य कसे करणार याबद्दल मौन बाळगले आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदी