शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात फक्त ६ घरे तयार , बांधायची होती दीड लाख घरे; राज्याने दिला नाही एकही पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:20 IST

विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. महाराष्ट्र सरकारने या वर्षात १ लाख ५0 हजार ९३४ घरे बांधणे अपेक्षित होते आणि ६६ हजार ८२८ घरांच्या बांधकामाला परवानगीही दिली होती.ग्रामविकास मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेसाठी १२७.0४ कोटी रुपये दिले. पण धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने या घरांसाठी एक पैसाही दिला नाही. केंद्र सरकार १ लाख ५0 हजार ९३९ घरांसाठी ११३0 कोटी रुपये देणार असून, महाराष्ट्राने ७५३ कोटी ४६ लाख रुपयांची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. पण महाराष्ट्राने ती केलेलीच नाही, असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते. काम इतक्या संथ गतीने सुरू असल्याचे पाहून केंद्र सरकारनेही ११.२४ टक्के रकमेचीच व्यवस्था केली.ग्रामीण विकास मंत्रालयाने म्हटले आहे की, २७ नोव्हेंबर २0१७ रोजी महाराष्ट्राकडे ७0५ कोटींहून अधिक रक्कम पडून आहे. महाराष्ट्र सरकारचा २0१६-१७मधील घरबांधणीचा वेग तुलनेने खूपच चांगला होता. तेव्हा २ लाख ३0 हजार ४२२ घरांचे लक्ष्य होते आणि त्यापैकी ३४ हजार ३९८ घरे बांधून पूर्ण झाली होती. म्हणजेच महाराष्ट्राने गेल्या वर्षी १५ टक्केच काम पूर्ण केले. अर्थात २0१६-१७मध्येही या घरांसाठी राज्याने काहीच निधी दिला नव्हता. केंद्राने १२९0 कोटींची तरतूद करून, त्यापैकी ६४५ कोटी रुपये मात्र दिले होते. महाराष्ट्राच्या ग्राम विकास विभागाच्या अधिकाºयांनी या वृत्तास दुजोरा दिला; तथा अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणींचीही माहिती दिली.गुजरातही मागेचगुजरातने २0१६-१७मध्ये २६३ कोटी या घरांसाठी उपलब्ध करून दिले आणि केंद्राने त्या राज्याला ३६५ कोटी दिले. पण गुजरातनेही केवळ ६७६ घरेच बांधून पूर्ण केली. या आर्थिक वर्षात गुजरातने ७१.८९ कोटी तर केंद्राने १0७ कोटी रुपये दिले. अर्थात गुजरातने या वर्षात ३६ घरेच बांधली आहेत. गुजरातनेही ५७८ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली नाही.

टॅग्स :HomeघरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारIndiaभारत