शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:31 IST

विरोधात कौल देण्याची परंपरा : मतदारांमध्ये नाराजी

सुहास शेलारजयपूर : ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा नारा देत राजस्थानी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणले. काँग्रेसने मोठमोठी आश्वासने देत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, विधानसभा निवडणुकी वेळी जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता न झाल्याने शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानाचा वाढलेला टक्काही काँग्रेसची धाकधूक वाढविणारा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा राहिली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. कालांतराने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकºयांना सत्तेत येताच १० दिवसांत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सहा महिने उलटूनही पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात रोष आहे. शिवाय शिक्षण, बेरोजगारी, आरक्षणप्रश्नी काँग्रेसने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे.

सत्तेत आल्यापासून गहलोत सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय गहलोत निर्णय घेऊ शकत नाहीत, असा संदेश सोशल मीडियावर फिरल्याने भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी गांधी-गहलोत-पायलट यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या सोशल सेलने निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले. शिवाय पक्षाच्या मधल्या फळीने तळागळात जाऊन प्रचार केला. पहिल्या टप्प्यातील मतदाना वेळीही भाजपचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढणे ही भाजपसाठी जमेची बाजू असल्याचे विश्लेषक सांगतात.

वसुंधरा राजेंना ठेवले प्रचारापासून दूरविधानसभा निवडणुकी वेळी ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा उघड नारा मतदारांनी दिला होता. त्यामुळे मोदींविषयी असलेले सर्वसामान्यांचे ‘मत’परिवर्तन होऊ नये म्हणून भाजपने खबरदारी घेतली आहे. वसुंधरा राजे कमीत कमी प्रचारसभांमध्ये कशा दिसतील, याची रणनीती अमित शहांनी आखल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदारांनी रचला इतिहास२९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी राजस्थानी मतदारांनी विक्रमी मतदान करीत इतिहास रचला. १३ जागांसाठी सोमवारी ६८.२२ टक्के मतदान झाले. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासूनची ही राजस्थानातील सर्वाधिक टक्केवारी आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असतानाच, मतदारांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असल्याचे विश्लेषक सांगतात.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघदुसऱ्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, नागौर, दौसा या मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानRajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019