शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:31 IST

विरोधात कौल देण्याची परंपरा : मतदारांमध्ये नाराजी

सुहास शेलारजयपूर : ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा नारा देत राजस्थानी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणले. काँग्रेसने मोठमोठी आश्वासने देत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, विधानसभा निवडणुकी वेळी जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता न झाल्याने शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानाचा वाढलेला टक्काही काँग्रेसची धाकधूक वाढविणारा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा राहिली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. कालांतराने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकºयांना सत्तेत येताच १० दिवसांत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सहा महिने उलटूनही पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात रोष आहे. शिवाय शिक्षण, बेरोजगारी, आरक्षणप्रश्नी काँग्रेसने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे.

सत्तेत आल्यापासून गहलोत सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय गहलोत निर्णय घेऊ शकत नाहीत, असा संदेश सोशल मीडियावर फिरल्याने भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी गांधी-गहलोत-पायलट यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या सोशल सेलने निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले. शिवाय पक्षाच्या मधल्या फळीने तळागळात जाऊन प्रचार केला. पहिल्या टप्प्यातील मतदाना वेळीही भाजपचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढणे ही भाजपसाठी जमेची बाजू असल्याचे विश्लेषक सांगतात.

वसुंधरा राजेंना ठेवले प्रचारापासून दूरविधानसभा निवडणुकी वेळी ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा उघड नारा मतदारांनी दिला होता. त्यामुळे मोदींविषयी असलेले सर्वसामान्यांचे ‘मत’परिवर्तन होऊ नये म्हणून भाजपने खबरदारी घेतली आहे. वसुंधरा राजे कमीत कमी प्रचारसभांमध्ये कशा दिसतील, याची रणनीती अमित शहांनी आखल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदारांनी रचला इतिहास२९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी राजस्थानी मतदारांनी विक्रमी मतदान करीत इतिहास रचला. १३ जागांसाठी सोमवारी ६८.२२ टक्के मतदान झाले. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासूनची ही राजस्थानातील सर्वाधिक टक्केवारी आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असतानाच, मतदारांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असल्याचे विश्लेषक सांगतात.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघदुसऱ्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, नागौर, दौसा या मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानRajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019