शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:31 IST

विरोधात कौल देण्याची परंपरा : मतदारांमध्ये नाराजी

सुहास शेलारजयपूर : ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा नारा देत राजस्थानी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणले. काँग्रेसने मोठमोठी आश्वासने देत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, विधानसभा निवडणुकी वेळी जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता न झाल्याने शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानाचा वाढलेला टक्काही काँग्रेसची धाकधूक वाढविणारा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा राहिली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. कालांतराने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकºयांना सत्तेत येताच १० दिवसांत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सहा महिने उलटूनही पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात रोष आहे. शिवाय शिक्षण, बेरोजगारी, आरक्षणप्रश्नी काँग्रेसने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे.

सत्तेत आल्यापासून गहलोत सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय गहलोत निर्णय घेऊ शकत नाहीत, असा संदेश सोशल मीडियावर फिरल्याने भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी गांधी-गहलोत-पायलट यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या सोशल सेलने निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले. शिवाय पक्षाच्या मधल्या फळीने तळागळात जाऊन प्रचार केला. पहिल्या टप्प्यातील मतदाना वेळीही भाजपचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढणे ही भाजपसाठी जमेची बाजू असल्याचे विश्लेषक सांगतात.

वसुंधरा राजेंना ठेवले प्रचारापासून दूरविधानसभा निवडणुकी वेळी ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा उघड नारा मतदारांनी दिला होता. त्यामुळे मोदींविषयी असलेले सर्वसामान्यांचे ‘मत’परिवर्तन होऊ नये म्हणून भाजपने खबरदारी घेतली आहे. वसुंधरा राजे कमीत कमी प्रचारसभांमध्ये कशा दिसतील, याची रणनीती अमित शहांनी आखल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदारांनी रचला इतिहास२९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी राजस्थानी मतदारांनी विक्रमी मतदान करीत इतिहास रचला. १३ जागांसाठी सोमवारी ६८.२२ टक्के मतदान झाले. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासूनची ही राजस्थानातील सर्वाधिक टक्केवारी आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असतानाच, मतदारांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असल्याचे विश्लेषक सांगतात.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघदुसऱ्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, नागौर, दौसा या मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानRajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019