शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 17:41 IST

CoronaVirus News : गेल्या वर्षी डिसेंबरपासून 10 प्रमुख सरकारी प्रयोगशाळा आणि संस्था कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंग करत आहेत, असेही सुजित सिंह म्हणाले.

ठळक मुद्देनॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एसीडीसी) चे संचालक सुजित सिंह यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या सर्वाधिक बर्‍याच लोकांना कोरोना व्हायरसच्या ब्रिटन व्हेरिएंटची लागण झाली आहे. तर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये 'डबल म्युटंट' प्रकारच्या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एसीडीसी) चे संचालक सुजित सिंह यांनी ही माहिती दिली. तसेच, सुजित सिंह यांनी असेही म्हटले आहे की, सार्स कोव्ह-2 व्हायरसचे बी 1.1.7 व्हेरिएंटमुळे (ब्रिटन प्रकार) देशातील संक्रमित होणाऱ्या लोकांचे प्रमाण गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. (uk variant dominates north india, double mutant in maharashtra, gujarat, karnataka)

सुजित सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पंजाब (482 नमुने), दिल्ली ((516 नमुने) यासह उत्तर भारतात व्हायरसचे ब्रिटन व्हेरिएंट मुख्यता लोकांना संक्रमित करत आहे. यानंतर त्याचा परिणाम तेलंगणा (192 नमुने), महाराष्ट्र (83 नमुने) आणि कर्नाटकात (82 नमुने) दिसून आला. गेल्या वर्षी डिसेंबरपासून 10 प्रमुख सरकारी प्रयोगशाळा आणि संस्था कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंग करत आहेत, असेही सुजित सिंह म्हणाले.

(कोरोना रुग्णांना दिलासा, बजाज हेल्थकेअरकडून 'Favijaj' टॅबलेट लाँच )

आतापर्यंत 18,053 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. सिक्वेन्सिंग संबंधी माहिती फेब्रुवारी महिन्यात दोनदा आणि मार्च-एप्रिलमध्ये चार वेळा राज्यांसोबत शेअर केली आहे. त्याचबरोबर, डबल म्यूटंट ज्याला बी.1.617 या नावानेही ओळखले जाते. याचा मुख्यत: महाराष्ट्र (721 नमुने), पश्चिम बंगाल (124 नमुने), दिल्ली (107 नमुने) आणि गुजरात (102 नमुने) वर परिणाम होत आहे, असे सुजित सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, दक्षिण आफ्रिकेच्या प्रकारच्या व्हायरसचा परिणाम प्रामुख्याने तेलंगणा आणि दिल्लीमध्ये दिसून आला. ज्याला बी.1.315 च्या नावाने ओळखले जाते. ब्राझिलियन प्रकार फक्त महाराष्ट्रात आढळला आणि त्याचे प्रमाण नगण्य आहे, असेही सुजित सिंह यांनी सांगितले.

(Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट)

11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असे रिसर्चमध्ये म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास रुग्णांची आणि मृतांची संख्या ही आणखी वाढू शकते. कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत