शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 17:41 IST

CoronaVirus News : गेल्या वर्षी डिसेंबरपासून 10 प्रमुख सरकारी प्रयोगशाळा आणि संस्था कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंग करत आहेत, असेही सुजित सिंह म्हणाले.

ठळक मुद्देनॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एसीडीसी) चे संचालक सुजित सिंह यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या सर्वाधिक बर्‍याच लोकांना कोरोना व्हायरसच्या ब्रिटन व्हेरिएंटची लागण झाली आहे. तर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये 'डबल म्युटंट' प्रकारच्या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एसीडीसी) चे संचालक सुजित सिंह यांनी ही माहिती दिली. तसेच, सुजित सिंह यांनी असेही म्हटले आहे की, सार्स कोव्ह-2 व्हायरसचे बी 1.1.7 व्हेरिएंटमुळे (ब्रिटन प्रकार) देशातील संक्रमित होणाऱ्या लोकांचे प्रमाण गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. (uk variant dominates north india, double mutant in maharashtra, gujarat, karnataka)

सुजित सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पंजाब (482 नमुने), दिल्ली ((516 नमुने) यासह उत्तर भारतात व्हायरसचे ब्रिटन व्हेरिएंट मुख्यता लोकांना संक्रमित करत आहे. यानंतर त्याचा परिणाम तेलंगणा (192 नमुने), महाराष्ट्र (83 नमुने) आणि कर्नाटकात (82 नमुने) दिसून आला. गेल्या वर्षी डिसेंबरपासून 10 प्रमुख सरकारी प्रयोगशाळा आणि संस्था कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सिंग करत आहेत, असेही सुजित सिंह म्हणाले.

(कोरोना रुग्णांना दिलासा, बजाज हेल्थकेअरकडून 'Favijaj' टॅबलेट लाँच )

आतापर्यंत 18,053 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. सिक्वेन्सिंग संबंधी माहिती फेब्रुवारी महिन्यात दोनदा आणि मार्च-एप्रिलमध्ये चार वेळा राज्यांसोबत शेअर केली आहे. त्याचबरोबर, डबल म्यूटंट ज्याला बी.1.617 या नावानेही ओळखले जाते. याचा मुख्यत: महाराष्ट्र (721 नमुने), पश्चिम बंगाल (124 नमुने), दिल्ली (107 नमुने) आणि गुजरात (102 नमुने) वर परिणाम होत आहे, असे सुजित सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, दक्षिण आफ्रिकेच्या प्रकारच्या व्हायरसचा परिणाम प्रामुख्याने तेलंगणा आणि दिल्लीमध्ये दिसून आला. ज्याला बी.1.315 च्या नावाने ओळखले जाते. ब्राझिलियन प्रकार फक्त महाराष्ट्रात आढळला आणि त्याचे प्रमाण नगण्य आहे, असेही सुजित सिंह यांनी सांगितले.

(Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट)

11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असे रिसर्चमध्ये म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास रुग्णांची आणि मृतांची संख्या ही आणखी वाढू शकते. कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत