शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 19:04 IST

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी संजय राऊतांच्या सरकारी निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचा मुक्काम आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दिल्लीत आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरेंसोबत दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित आहेत. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत गाठीभेटी करत आहेत.

लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते. अवघ्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआनं महायुतीला फटका देत चांगले यश मिळवले. ४८ पैकी ३१ जागांवर मविआचे उमेदवार निवडून आलेत. मात्र जागावाटपात काही ठिकाणी मविआत वाद झाल्याचं दिसून आले होते. विधानसभेत असा वाद उद्भवू नये यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

"‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’, अशी उबाठाची अवस्था" 

मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावे लागत आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात, तेव्हा तुम्ही टीका करतात. बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबध नाही, असे सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर केली. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०१९ ला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याआधी राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. काँग्रेसनेही राज्यात २० ऑगस्टपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४