शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 19:04 IST

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी संजय राऊतांच्या सरकारी निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचा मुक्काम आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दिल्लीत आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरेंसोबत दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित आहेत. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत गाठीभेटी करत आहेत.

लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते. अवघ्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआनं महायुतीला फटका देत चांगले यश मिळवले. ४८ पैकी ३१ जागांवर मविआचे उमेदवार निवडून आलेत. मात्र जागावाटपात काही ठिकाणी मविआत वाद झाल्याचं दिसून आले होते. विधानसभेत असा वाद उद्भवू नये यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

"‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’, अशी उबाठाची अवस्था" 

मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावे लागत आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात, तेव्हा तुम्ही टीका करतात. बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबध नाही, असे सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर केली. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०१९ ला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याआधी राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. काँग्रेसनेही राज्यात २० ऑगस्टपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४