शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

तृणमूलचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल, तीन नगरपालिकांत सत्ता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:11 IST

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे. त्या पक्षातील अनेकांना भाजप हाच राज्यातील सर्वांत मोठा, महत्त्वाचा व प्रसंगी विधानसभा निवडणुकीद्वारे सत्ता मिळवू शकणारा पक्ष बनू शकेल, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसमध्ये गळती सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूलच्या दोन आमदारांनी व ५० नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. इतके सारे नगरसेवक फुटल्याने पश्चिम बंगालधील तीन नगरपालिकांमध्ये आता भाजप सत्तेत येऊ शकेल. भाजपने या सर्व आमदार व नगरसेवकांना दिल्लीत आणून पक्षात प्रवेश दिला.भाजपचे सरचिटणीस व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय व राज्यातील महत्त्वाचे नेते मुकुल रॉय यांनी पत्रकार परिषदेत आमदार व नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुतांश नगरसेवक उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आहेत. लोकसभा निवडणुकांत भाजपने १८ जागा जिंकून तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे.मुकुल रॉय हेही तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते आहेत. आता त्यांचे पुत्र व तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशू रॉय (बिजापूर) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याबरोबरच याच पक्षाचे आणखी एक आमदार तुषारकांती भट्टाचार्य (विष्णुपूर) आणि हेमताबादचे माकपचे आमदार देवेंद्रनाथ रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे आणखी आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी या वेळी केला.पश्चिम बंगालमध्ये दोनवर्षांनी, २०२१ साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत तेथील पक्ष संघटना बळकट करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात येतआहे. तृणमूलचे नेते व कार्यकर्तेच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी खूप मदत करू शकतील, असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत आहे.>ममतांविषयी राग नाहीभाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या एका नगरसेवकाला बाहेर पडण्याचे कारण विचारता तो म्हणाला की, आमचा ममता बॅनर्जी यांच्यावर राग नव्हता वा त्यांच्या कार्यपद्धतीविषयीही आमची तक्रार नव्हती.पण भाजप पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहून आपण प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आपण तृणमूल सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बहुसंख्य तृणमूल नगरसेवकांचेही हेच म्हणणे दिसले. भाजपमध्ये गेल्यास आपल्यालाही पुढे जाण्याची संधी मिळेल, असे या नगरसेवकांना वाटत आहे.

टॅग्स :BJPभाजपा