शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूलचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल, तीन नगरपालिकांत सत्ता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:11 IST

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे. त्या पक्षातील अनेकांना भाजप हाच राज्यातील सर्वांत मोठा, महत्त्वाचा व प्रसंगी विधानसभा निवडणुकीद्वारे सत्ता मिळवू शकणारा पक्ष बनू शकेल, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसमध्ये गळती सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूलच्या दोन आमदारांनी व ५० नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. इतके सारे नगरसेवक फुटल्याने पश्चिम बंगालधील तीन नगरपालिकांमध्ये आता भाजप सत्तेत येऊ शकेल. भाजपने या सर्व आमदार व नगरसेवकांना दिल्लीत आणून पक्षात प्रवेश दिला.भाजपचे सरचिटणीस व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय व राज्यातील महत्त्वाचे नेते मुकुल रॉय यांनी पत्रकार परिषदेत आमदार व नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुतांश नगरसेवक उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आहेत. लोकसभा निवडणुकांत भाजपने १८ जागा जिंकून तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे.मुकुल रॉय हेही तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते आहेत. आता त्यांचे पुत्र व तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशू रॉय (बिजापूर) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याबरोबरच याच पक्षाचे आणखी एक आमदार तुषारकांती भट्टाचार्य (विष्णुपूर) आणि हेमताबादचे माकपचे आमदार देवेंद्रनाथ रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे आणखी आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी या वेळी केला.पश्चिम बंगालमध्ये दोनवर्षांनी, २०२१ साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत तेथील पक्ष संघटना बळकट करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात येतआहे. तृणमूलचे नेते व कार्यकर्तेच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी खूप मदत करू शकतील, असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत आहे.>ममतांविषयी राग नाहीभाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या एका नगरसेवकाला बाहेर पडण्याचे कारण विचारता तो म्हणाला की, आमचा ममता बॅनर्जी यांच्यावर राग नव्हता वा त्यांच्या कार्यपद्धतीविषयीही आमची तक्रार नव्हती.पण भाजप पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहून आपण प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आपण तृणमूल सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बहुसंख्य तृणमूल नगरसेवकांचेही हेच म्हणणे दिसले. भाजपमध्ये गेल्यास आपल्यालाही पुढे जाण्याची संधी मिळेल, असे या नगरसेवकांना वाटत आहे.

टॅग्स :BJPभाजपा