शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केंद्रातील भाजप सरकारशी विरोधक करणार दोन हात; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 02:02 IST

विद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक भेदभाव सहन करणार नाही

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी सोमवारी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ले चढविले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात विद्वेषाचे आणि धार्मिक भेदभावाचे राजकारण करीत आहे. त्यासाठी सीएए, एनआरसी व एनपीआरचा वापर करीत असल्याचा आरोप या विरोधी नेत्यांनी केला.

जेएनयूसह सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे, विद्यापीठांमध्ये दडपशाही सुरू आहे. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना मारहाण करून डांबून ठेवण्यात येत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी बैठकीत केला. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना, त्याबाबत उपाय योजण्याऐवजी सरकार देशातील जनतेत जाती-धर्माच्या आधारे फूट पाडत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या बैठकीला तृणमूल, बसप, शिवसेना, आम आदमी पार्टी यांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप व काँग्रेस एकमेकांविरोधात लढत असल्याने आपचे नेते येणार नाहीत, ही अपेक्षा होतीच. बसपचे राजस्थानातील सहा आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने संतापलेल्या मायावती यांनीही बैठकीला जाणार नसल्याचे घोषित केले होते. द्रमुकचे नेतेही हजर नव्हते, पण अन्य आधीच ठरलेल्या कार्यक्रमांमुळे येणे शक्य नसल्याचे एम. के. स्टॅलिन यांनी कळविले.

या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राजदचे मनोज झा, भाकपचे डी. राजा, एलजेडीचे शरद यादव यांच्यासह मुस्लीम लीग, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जनता दल (धर्मनिरपेक्ष) आदी पक्षांचे नेते हजर होते.आवाज बंद करण्याचे प्रयत्नबैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरले असून, त्यामुळेच देशात भीती व दडपशाहीचे वातावरण निर्माण करीत आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्यापेक्षा त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस