शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 18:56 IST

दहशतवाद्याच्या टॉप कमांडर्सला ठार केल्यानंतर सुरक्षा दलांची नवी मोहीम

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील रणनितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये 70 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलांनी आता 'त्यांना जिवंत पकडा,' अशी घोषणा दिली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना पकडून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यासाठी सुरक्षा दलांनी रणनितीत मोठा बदल केला आहे. याआधी दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवलं होतं.  दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं रणनितीत बदल करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 'अनेक तरुणांना जिहाद करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. हे तरुण दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या ब्रेन वॉशिंगचे बळी ठरतात. त्यांना जिवंत पकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल,' अशी माहिती दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. पंधरा-सोळा वर्षांच्या तरुणांचं ब्रेनवॉशिंग केलं जातं. याची तीव्रता इतकी जास्त असते की, हे तरुण मरायला तयार होतात. या सगळ्या गोष्टींची कारणमिमांसा होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. 'गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांच्या अनेक टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. हेच कमांडर्स लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्यासारख्या संघटनांमध्ये तरुणांची भरती करत होते. तरुणांना दहशतवादी मार्गाकडे नेण्यात कमांडर्सची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा खात्मा करण्यात आल्यामुळे आता सुरक्षा दलांनी पवित्रा बदलला', अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर